नवी दिल्ली : आमदनी अठ्ठनी खर्चा रुपया अशी हिंदीत एक म्हण आणि चित्रपट आहे. बॉलीवूडच्या या चित्रपटात पैशांची उधळपट्टी करणाऱ्यांचे वास्तव्य दाखवले आहे. जर तुम्हीपण असे करत असाल तर वेळीच स्वतःला आवर घाला, कारण जर तुमचा पगार २० हजार आणि खर्च २५ हजार असेल तर तुमचे पाकिट नेहमीच रिकामे राहील. जीवनातील आर्थिक समस्यांसाठी नियोजन करणे खूप महत्त्वाचे आहे. अनेक वेळा नियोजनाच्या अभावामुळे आपण अशा काही चुका करतो ज्याचा आर्थिक जीवनावर वाईट परिणाम होतो.

येथे आम्ही तुम्हाला अशाच चुकांबद्दल सांगत आहोत आणि त्या कशा टाळू शकता हे देखील समजून घेऊया…

सेवानिवृत्तीच्या तयारीसाठी आर्थिक चेकलिस्ट गुंतवणूकदारांनो धोकेही लक्षात घ्या
रोख जवळ बाळगणे
बहुतेक भारतीय आपली बचत रोखीच्या रूपात त्यांच्याकडे ठेवतात. नोटाबंदीच्या वेळी प्रत्येकाच्या घरातून ज्या पद्धतीने मोठ्या प्रमाणात चलनी नोटा बाहेर आल्या त्यावरून आपल्याला रोखीची किती आवड आहे, हे दिसून येते. पण तुमची बचत रोख रकमेच्या रूपात कपाटात किंवा घराच्या छातात लपवून ठेवणे शहाणपणाचे नाही. यातून परतावा मिळत नाही, त्यामुळे तुमची बचत एका बॉक्समध्ये ठेवण्याऐवजी ती कुठेतरी गुंतवणे चांगले आहे. तुम्ही तुमची बचत अशा ठिकाणी गुंतवा जिथून तुम्हाला जास्त परतावा मिळेल.

गुंतवणुकीला उशीर करणे किंवा गुंतवणूक न करणे
गुंतवणूक जितक्या लवकर सुरू केली तितके चांगले, परंतु अनेक वेळा सामान्य लोक गुंतवणूक करण्यास कचरतात आणि गुंतवणूक टाळतात. तुम्ही चुकूनही अशी चूक करू नका आणि तुमच्या आर्थिक नियोजनात गुंतवणुकीचा नक्कीच समावेश करा. तुम्ही पारंपारिक गुंतवणुकीच्या पर्यायांमध्ये पैसे गुंतवले किंवा जोखमीच्या पर्यायांमध्ये पैसे गुंतवलेत तरी पैशांची गुंतवणूक करण्याची खात्री करा. पैसा फक्त बचत करून वाढत नाही तर गुंतवणुकीने वाढतो, ही गोष्ट लक्षात ठेवा.

Property: नॉमिनी की उत्तराधिकारी… तुमच्या नंतर संपत्तीचा खरा मालक कोण? जाणून घ्या फरक
सर्व पैसे एकाच ठिकाणी गुंतवणे
साधारणपणे बहुतेक भारतीय गुंतवणुकीच्या बाबतीतही एक कॉमन चूक करतात आणि ती म्हणजे फक्त एका मालमत्तेत पैसे गुंतवतात. तुमच्या सर्व निधीतून मालमत्ता किंवा सोने खरेदी करणे, ही एक मोठी चूक आहे त्यामुळे संपत्तीची वाढ थांबते. एवढेच नाही तर मंदी असताना तुमचे पैसे एकाच ठिकाणी अडकतात, त्यामुळे सर्व पैसे एकाच ठिकाणी गुंतवण्याची चूक करू नका. तुमच्या वैविध्यपूर्ण पोर्टफोलिओमध्ये अनेक ठिकाणांहून परतावा येतो. एवढेच नाही तर एका ठिकाणी नुकसान झाले तरी तुमचे बजेट बिघडत नाही कारण इतर ठिकाणी केलेल्या गुंतवणुकीतून तुम्हाला परतावा मिळत राहतो.

पर्सनल लोनचे हप्ते जड होतायेत? जाणून घ्या दुसऱ्या बँकेत ट्रान्सफर करणं फायद्याचं की तोट्याचं
गुंतवणुकीचा वारंवार आढावा न घेणे
तुम्ही गुंतवणूक केली पण त्याचा नियमित आढावा घेतला नाही तर तुम्हाला अपेक्षेपेक्षा कमी परतावा मिळण्याची शक्यता आहे. तुमचे वय, जोखीम घेण्याची क्षमता आणि आर्थिक उद्दिष्टे यांच्या आधारे तुमच्या गुंतवणूक पोर्टफोलिओमध्ये वारंवार बदल करा. जो गुंतवणूकदार बाजारात सतत सक्रिय असतो त्याला अधिक परतावा मिळण्याची अपेक्षा असते.

निवृत्तीनंतरची तरतूद कशी करावी?

विमा पैशाचा अपव्यय नाही
बहुतेक भारतीय विमा पैशाचा अपव्यय मानतात, पण तसे नाही. लाइफ इन्शुरन्स आणि हेल्थ इन्शुरन्समध्ये गुंतवणूक केल्याने तुम्हाला आर्थिक सुरक्षा तर मिळतेच, पण त्यामुळे तुम्हाला मनःशांतीही मिळते. जर तुमच्या कुटुंबाची जबाबदारी तुमच्यावर असेल तर तुम्हाला विमा उतरवायला हवा कारण जर अपघातामुळे तुमचं बरं-वाईट झालं तर तुमचा विमा उतरवल्यावर तुमच्या कुटुंबाला चांगली रक्कम मिळते, ज्यामुळे त्यांचे भविष्य सुरक्षित राहते.

तुमच्या गुंतवणुकीत विविधता न ठेवणे
गुंतवणुकीत त्यांच्या गरजेनुसार वैविध्य आणत राहिले पाहिजे. उदाहरणार्थ जर तुम्हाला निश्चित परतावा हवा असेल तर PPF, मुदत ठेव इत्यादी पारंपरिक गुंतवणूक पर्यायांमध्ये गुंतवणूक करा. याशिवाय जर तुम्हाला जलद आणि जास्त परतावा हवा असेल तर तुम्ही म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील विविध पर्यायांमध्ये गुंतवणूक करू शकता. एकूणच सर्व गुंतवणूक एकाच प्रकारच्या पर्यायांमध्ये ठेवू नका.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here