पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे एकेकाळचे विश्वासू सहकारी म्हणून ओळख असलेले मंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या एका वक्तव्याची कालपासून बरीच चर्चा रंगली आहे. शरद पवार यांना महाराष्ट्रात कधीच एकहाती सत्ता आणता आली नाही, असे सांगत दिलीप वळसे पाटील यांनी पवारांच्या राजकारणाच्या मर्यादा दाखवून दिल्या होत्या. त्यांच्या या वक्तव्यामुळे शरद पवार समर्थक आक्रमक झाले होते. जितेंद्र आव्हाड यांच्यासह शरद पवार गटातील नेत्यांनी दिलीप वळसे-पाटील यांचा चांगलाच समाचार घेतला होता. इतक्या मोठ्याप्रमाणात टीकेची राळ उठताना पाहून दिलीप वळसे-पाटील यांना अखेर प्रसारमाध्यमांसमोर येत सारवासारव करावी लागली. मी शरद पवार यांच्याविषयी अवमानजक काहीच बोललो नव्हतो. प्रसारमाध्यमांनी माझ्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचे वळसे पाटील यांनी म्हटले.

माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला आहे. माझं संपूर्ण भाषण ऐकलं तर मी पवार साहेबांबद्दल असं काही बोललो नाही. पवार साहेबांनी ४० ते ५० वर्ष आपल्या राज्यासाठी आणि देशासाठी काम केलं आहे. देशात अनेक प्रादेशिक पक्ष आहेत. त्यातील अनेक प्रादेशिक पक्ष आपल्या हिमतीवर बहूमत मिळवून सत्तेवर बसतात. परंतु महाराष्ट्रातील जनतेने अशी शक्ति पवार साहेबांच्या सोबत उभी केली नाही, याची मला खंत आहे, आणि ती खंत मी व्यक्त करत होतो. पवार साहेबांना कमी लेखण्याचा किंवा पवार साहेबांना चुकीचं काही बोलण्याचा प्रश्न उद्भवत नाही, असे स्पष्टीकरण वळसे पाटील यांनी दिले.

Sharad Pawar: ईडीच्या भीतीनं सहकाऱ्यांनी वाट बदलली, भेकड प्रवृत्तीला लोक जागा दाखवतील, शरद पवारांचा हल्लाबोल

दिलीप वळसे पाटील नेमकं काय म्हणाले?

शरद पवार हे उत्तुंग नेते आहेत असं आपण म्हणतो. त्यांच्या आसपास फिरकणारा देशात एकही नेता नसल्याचं आपण म्हणतो. पण त्यांना राज्यात कधीच एकहाती सत्ता आणता आली नाही, असे वक्तव्य दिली वळसे पाटील यांनी केले होते.

मोठी बातमी: अजितदादांनी तिखट प्रश्न विचारताच मुख्यमंत्री खवळले; बैठकीत वाद होताच फडणवीस धावले!

जितेंद्र आव्हाडांची वळसे-पाटलांवर टीका

वळसे पाटील यांची झालेली नैतिक अधोगती पाहून वाईट वाटले. साहेबांचा सर्वात विश्वासू साथीदार,साहेबांच्या लेखी अत्यंत हुशार असणारा हा माणूस,प्रत्यक्षात मात्र अत्यंत कृतघ्न निघाला.साहेबांच्या नजरेने या माणसातील हा गुण कसा काय हेरला नाही,याच आश्चर्य वाटते.साहेबांनी घडवलेल्या दुसऱ्या फळीतील बहुतांशी नेत्यांनी आता आपली निष्ठा ही सत्तेसाठी पार विकून खाल्ली आहे. बाजूच्या मतदार संघात आमदार नाही निवडून आणू शकले. वळसे पाटील जे काही बोलले,त्याबद्दल काही वाईट वाटत नाही…पण आदरणीय साहेबांच्या साठी मात्र खूप वाईट वाटले. अनेकांना सर्व काही देऊन देखील साहेब मात्र कायमच रीते राहिले. बरे झाले साहेबांन विषयी ह्यांच्या मनातले विष बाहेर पडते आहे. महाराष्ट्र विसरणार नाही क्षमा करणार नाही. आंबेगाव धडा शिकवेल, असा इशारा जितेंद्र आव्हाड यांनी वळसे-पाटील यांना दिला होता.

शरद पवारांच्या स्वागतासाठी दिलीप वळसे पाटील हजर, मात्र पुण्यात असूनही अजित पवारांची दांडी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here