पुण्यातील टीव्ही पत्रकार पांडुरंग रायकर यांचा आज करोनामुळे मृत्यू झाला. ऑक्सिजन लेव्हल कमी झाल्यानं त्यांना दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यासाठी कार्डिअॅक अँब्युलन्सची गरज होती. मात्र, ती वेळेवर न मिळाल्यानं त्यांना प्राण गमवावे लागले. आरोग्य सुविधांच्या या अवस्थेवरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरलं आहे. संदीप देशपांडे यांनी मुख्यमंत्र्यांवरच तोफ डागली आहे. ‘पुण्यात अलीकडेच जम्बो कोविड सेंटरचं उद्घाटन करण्यात आलं. तिथं पांडुरंग रायकर यांना का हलवलं नाही? तिथं सुविधा नव्हती का? केवळ नावाला तंबू उभारले आहेत का,’ असे प्रश्न देशपांडे यांनी उपस्थित केले.
वाचा:
‘करोनाचं ठीक आहे. पण आज लोकांना नोकऱ्या नाहीत. लाखो लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. कसं जगायचं हा प्रश्न लोकांना पडला आहे. हे सगळं होत असताना मुख्यमंत्री कुठे आहेत? ते कधी बाहेर पडणार आहेत? कधी लोकांना दिलासा देणार आहेत?,’ अशी सरबत्तीच त्यांनी केली. ‘सरकारनं केवळ पैसे ओरपण्याचं काम केलं आहे हे मी जबाबदारीनं सांगतो. प्रत्यक्षात रुग्णांना कुठल्याही सुविधा मिळालेल्या नाहीत,’ असा आरोपही त्यांनी केला. ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Very good article! We are linking to this particularly great content on our site. Keep up the great writing.
I always spent my half an hour to read this web site’s articles or reviews daily along with a mug of coffee.
Good one! Interesting article over here. It’s pretty worth enough for me.
I like the valuable information you provide in your articles.
I really like and appreciate your blog post.
Like!! I blog quite often and I genuinely thank you for your information. The article has truly peaked my interest.