मुंबईः कार्डिअॅक अँब्युलन्सच्या अभावी पुण्यात पत्रकार रायकर यांच्या मृत्यूनंतर राज्यातील राजकारण तापले आहे. भाजप आमदार यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. ‘महाराष्ट्र सरकारच्या गलथान कारभारामुळं पत्रकार रायकर यांचा खुन झाला,’ असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

पुण्यातील टीव्ही पत्रकार यांचा आज करोनामुळे मृत्यू झाला. ऑक्सिजन लेव्हल कमी झाल्यानं त्यांना दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यासाठी कार्डिअॅक अँब्युलन्सची गरज होती. मात्र, ती वेळेवर न मिळाल्यानं त्यांना प्राण गमवावे लागले. आरोग्य सुविधांच्या या अवस्थेवरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरलं आहे. नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘पुण्यात टीव्ही पत्रकार रायकर यांचा खुन झाला? असा आरोप त्यांनी केला आहे. हे सत्य आहे. कारण, महाराष्ट्र शासनाच्या गलथान कारभारामुळं जीव गेला. करोना काळात निस्वार्थी भावनेनं सेवा देणारे पत्रकार ही सुरक्षित नाहीत. त्या कोव्हिड सेंटरचे उद्घाटन करणाऱ्या मुख्यमंत्र्यांचा राजीनामा घ्या. तीच खरी श्रद्धांजली,’ अशी मागणी त्यांनी केली आहे.

वाचाः

दरम्यान, टीव्ही पत्रकार पांडुरंग रायकर यांचं निधन झाल्यानंतर आरोग्य व्यवस्थेतील त्रुटींचा प्रश्न ऐरणीवर आला असून सर्व स्तरातून सरकारवर टीका होत आहेत. राज्य सरकारनंही या घटनेची गंभीर दखल घेतली असून विभागीय आयुक्तांकडून अहवाल मागवला आहे.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

6 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here