वाचा:
सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिका क्षेत्रासह ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात करोनाचा संसर्ग वाढला आहे. रुग्णांना खाटा मिळत नाहीत. ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरची टंचाई असल्याने रुग्णांचा मृत्यूदर वाढत आहे. याबाबत बोलताना पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, ‘ऑक्सिजनच्या उपलब्धतेचे संभाव्य संकट लक्षात घेऊन औद्योगिक वापरासाठी दिला जाणारा पुरवठा थांबवला आहे. गंभीर रुग्णांसाठी नवे ४० व्हेंटिलेटर आले आहेत. लवकरच आणखी ४० व्हेंटिलेटर मिळणार आहेत. आरोग्य यंत्रणांवरील वाढलेला ताण लक्षात घेऊन मुंबईतून आवश्यक मनुष्यबळ आणि सुविधा मागवल्या आहेत. येणाऱ्या आठवडाभरात मुंबईतील पथक सांगलीत दाखल होईल.’
वाचा:
दरम्यान, विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी बुधवारी सांगलीतील स्थितीचा आढावा घेऊन उपचारासाठी खासगी डॉक्टरांची मदत घेण्याच्या सूचना दिल्या. मदत न करणाऱ्या खासगी डॉक्टरांवर कारवाई करून हॉस्पिटल ताब्यात घेण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. आढावा बैठकीनंतर विभागीय आयुक्तांनी जिल्हा क्रीडा संकुल येथे उभारण्यात येत असलेल्या ११० खाटांच्या कोव्हिड उपचार केंद्राची पाहणी केली. आढावा बैठकीसाठी जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा, महानगरपालिकेचे आयुक्त नितीन कापडणीस, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर, आदी उपस्थित होते.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times