वाचा:
मंत्रालयात झूम अॅपच्या माध्यमातून कोकण विभागाची आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी आमदार , कोकण विभागाचे विभागीय आयुक्त अण्णासाहेब मिसाळ, सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, रत्नागिरी जिल्हाधिकारी लक्ष्मी नारायण मिश्र, पोलीस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम आदि उपस्थित होते.
वाचा:
उदय सामंत म्हणाले, संकटाशी सामना करीत असताना केंद्र आणि राज्य सरकारतर्फे वारंवार वाहतुकीच्या आणि प्रवासाच्या नियमांमध्ये बदल करीत आले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये व्यवसाय करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांची आणि कामगारांची संख्या लक्षणीय आहे. याचा विचार करीत आणि त्यांची कसलीही गैरसोय होऊ नये म्हणून जिल्ह्यात प्रवासासाठी घातलेले निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत.
वाचा:
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सर्व सीमा खुल्या करण्यात आल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यात येणे व जाणे सोयीस्कर होणार आहे. तसेच तपासणी नाक्यांवर प्रवेश करणाऱ्यांची प्राथमिक माहिती घेतली जाईल. त्यांचे थर्मल स्क्रीनिंग करण्यात येईल. गोवा राज्यातून कामानिमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणारे व गोवा राज्यात जाणारे यांना परवानगी असेल. आता जिल्ह्याच्या सर्व सीमा खुल्या झाल्या असल्याचे सिंधुदुर्ग पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले. बैठकीत वाळू लिलाव संदर्भातही चर्चा करण्यात आली.
वाचा:
Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News – Maharashtra Times