वाचा-
आयपीएलचे वेळापत्रक बनवण्यात बीसीसीआयला काही समस्या जाणवत आहेत. पहिली गोष्ट तर करोनाचं संकट तर आहेच. पण त्याचबरोबर सर्वात युएईमध्ये सध्याच्या घडीला उष्म वातावरणार आहे. त्यामुळे कडक गर्मी जाणवत आहे. त्यामुळेच खेळाडूंनी दुपारी सराव न करण्याचाही निर्णय घेतला आहे. त्यामुळे बीसीसीआयला यावर्षी आयपीएलचे वेळापत्रक बनवायला वेळ लागल्याचे म्हटले जात आहे.
काही दिवसांपूर्वी चेन्नईच्या संघातील १४ सदस्यांना करोना झाल्याचे पाहायला मिळाले होते. यावर्षीच्या आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यामध्ये सलामीची लढत होणार आहे. पण चेन्नईच्या संघातील १४ व्यक्ती करोना झाल्यामुळे त्यांच्या क्वारंटाइनचा अवधी वाढवण्यात आलेला आहे. त्यामुळे चेन्नई सलामीच्या लढतीत खेळणार का, हा सर्वात मोठा प्रश्न बीसीसीआयपुढे होता. या प्रश्नाचे उत्तर मिळाल्यावर बीसीसीआयने आयपीएलचे वेळापत्रक बनवल्याचे समजते आहे.
वाचा-
आयपीएलचे वेळापत्रक कधी जाहीर होणार, याबाबत गांगुली यांना प्रश्न विचारला होता. त्यावर गांगुली यांनी सांगितले की,” यावर्षी होणाऱ्या आयपीएल स्पर्धेचे वेळापत्रक हे ४ सप्टेंबरला जाहीर करण्यात येणार आहे.”
आयपीएलचे आयोजन करताना वातावरणाचा विचार करणेही महत्वाचे असते. युएईमध्ये सर्वात जास्त उष्ण वातावरण हे अबुधाबी येथे आहे. त्यामुळे अबुधाबी येथे बीसीसीआयला जास्त सामने खेळवायचे नाहीत. कारण अबुधाबीला जास्त सामने खेळवले तर त्याचा विपरीत परीणाम खेळाडूंवर होऊ शकतो, असे म्हटले जात आहे. त्यामुळेच बीसीसीआयला आयपीएलचे वेळापत्रक बनवण्यासाठी वेळ लागत असल्याचे म्हटले जात आहे. पण चाहत्यांना मात्र आयपीएलच्या वेळापत्रकाची उत्सुकता लागून राहीलेली होती.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times