चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी १४.५० कोटी रुपयांची कमाई केली आहे. इंडियाने ही माहिती दिली आहे. हा चित्रपट पहिल्याच दिवशी १६ कोटी रुपयांची कमाई करेल, असा अंदाज वर्तवण्यात आला होता. उत्तर भारत आणि पूर्व भारतात हा चित्रपट चांगली कमाई करत आहे. पहिल्या दिवशी चित्रपटाने केलेल्या एकूण कमाईपैकी ५० टक्के वाटा मुंबईचा आहे. शनिवार आणि रविवार या सुट्टींच्या दिवशी हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
अजय देवगण, काजोल आणि सैफ अली खान यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या चित्रपटाचे समीक्षकांनी कौतुक केले आहे. तान्हाजी हा चित्रपट अजय देवगणचा बॉलिवूडमधील १०० वा चित्रपट असल्याने त्याच्या कारकिर्दीत या चित्रपटाला विशेष महत्त्व असल्याचे सांगितले जात आहे. हा चित्रपट प्रदर्शनापूर्वी शालेय विद्यार्थांना दाखवण्यात आला होता. अजय देवगणनेच याचे आयोजन केले होते. तान्हाजी आणि या दोन चित्रपटांसंदर्भात ट्विटरवॉर सुरू झाले होते. त्यामुळे दोन्ही चित्रपट पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर किती कमाल करतात, याची उत्सुकता लागली होती. छपाक चित्रपटाने पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर ५ कोटी रुपयांची कमाई केली आहे.
दरम्यान, तान्हाजीः द अनसंग वॉरियर हा चित्रपट छत्रपती शिवाजी महाराजांचा शूरवीर मावळा तानाजी मालुसरे यांच्या जीवनावर आधारित आहे. शालेय इतिहासातील पुस्तकात एका परिच्छेदापुढे तानाजी मालुसरेंविषयी काही माहिती मिळत नाही. त्यामुळे या चित्रपटाची निर्मिती करण्याचे अजय देवगण याने ठरवल्याचे सांगितले जाते.
अनसंग वॉरियर चित्रपटाची सीरिज काढण्यात येणार असल्याची माहिती अजय देवगणने दिली. संपूर्ण देशभरात अनेकांनी आपले शौर्य गाजवले आहे. यामुळे देशाला स्वातंत्र्य मिळाले. देशासाठी अनेकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आहे. तानाजींचे कार्य महाराष्ट्रात होते. मात्र, पंजाब, बंगाल आणि राजस्थानासह देशातील अनेक भागात अनेक शूरवीर जन्माला आले. मात्र, त्यांचे कार्य आणि शौर्य त्या त्या भागांपर्यंत मर्यादित राहिले. त्यामुळे या सीरिजच्या माध्यमातून त्यांच्या कार्यावर आणि शौर्यावर प्रकाश टाकला जाणार असल्याचे अजय देवगण याने सांगितले.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times