नवी दिल्ली : भारताच्या आजवरच्या एव्हिएशन क्षेत्रात जिथे असंख्य एअरलाइन्सचे लँडिंग झाले आहे, तिथे एका अप्रत्याशित भागीदारीतून एक अनोखी यशोगाथा समोर आली आहे. राकेश गंगवाल आणि राहुल भाटिया, वेगवेगळ्या व्यावसायिक पार्श्वभूमीतील दोन मित्रांनी आपले व्हिजन आणि कौशल्य एकत्र करत भारताची सर्वात यशस्वी एअरलाइन – इंडिगो, उभी केली.

सुप्रसिद्ध एअरलाइन कंपनी इंडिगोने आपल्या सोशल मीडिया हँडलवर एक ओळ लिहिली आहे – Always affordable, on-time and hassle-free म्हणजे नेहमी परवडणारी, वक्तशीर आणि त्रसमुक्त प्रवास. या विचारसरणीचा परिणाम इंडिगोच्या आतापर्यंतच्या प्रवासात दिसून येतो.

IIMची नोकरी, दरमहा लाखांची नोकरी; सगळं सोडून सुरू केली दूध विक्री, उभी केली कोटींची कंपनी
इंडिगोची सुरूवात कशी झाली
राहुल भाटिया दिल्लीचे तर राकेश गंगवाल अमेरिकेत राहायचे. राकेश यांनी अनेक बड्या एअरवेज कंपन्यांमध्ये काम केले होते, त्यामुळे त्यांना या क्षेत्राचे चांगले ज्ञान होते. राहुलने राकेशपुढे एअरलाइन सुरू करण्याचा प्रस्ताव दिला. अशाप्रकारे २००४ मध्ये इंडिगोची मूळ कंपनी, इंटरग्लोब एव्हिएशनची सुरुवात झाली. त्यावेळी देशातील विमान वाहतूक उद्योगाला मोठा तोटा होत होता, मात्र असे असूनही दोघांनीही या क्षेत्रात येण्याचा निर्णय घेतला.

त्याच वर्षी त्यांना विमानसेवा सुरू करण्याचा परवानाही मिळाला, परंतु कंपनीकडे विमाने नसल्याने २००६ पर्यंत कंपनीला आपली सेवा सुरू करता आली नाही. त्यांच्या ओळखीमुळे गंगवाल यांनी कंपनीला एअरबसकडून कर्जावर १०० विमाने मिळाली. अखेरीस ४ ऑगस्ट २००६ पासून कंपनीने उड्डाण सुरू केले.

ट्रॅव्हल एजंट म्हणून काम मग एअरलाइन क्षेत्रात ‘टेक ऑफ’; एक चुकीच्या निर्णयाने कंपनी डबगाईला
दोन मित्रानी ठेवली यशस्वी एअरलाइनचा पाय घातला
दोघांच्या भेटीत स्वतःची विमानसेवा सुरू करण्याबाबत चर्चा झाली. दरम्यान १९८९ मध्ये हवाई वाहतूक व्यवस्थापित करण्यासाठी इंटरग्लोब एंटरप्राइज नावाची कंपनी स्थापन करण्यात आली. बैठका सुरू राहिल्या आणि विमान कंपनीची तयारी सुरूच राहिली, त्यानंतर २००६ मध्ये दोघांनी एकत्र मिळून सुरूवात केली.

दोघांनी जबाबदारी वाटून घेतली. राहुल भाटिया यांनी नेटवर्किंग व एअरलाइनशी संबंधित गोष्टींचे आयोजन करण्याची जबाबदारी घेतली तर राकेश गंगवाल यांनी व्यवसायासह विमानाशी संबंधित बाबींची जबाबदारी स्वीकारली. अशाप्रकारे दोघांनी मिळून कंपनीला गती दिली. सुरूवातीला इंडिगोमध्ये राहुलची ५१.१२% तर राकेश गंगवालची ४८% भागीदारी होती. मात्र नंतर दोघांमध्ये अनेक बाबींवर मतभेद झाले आणि राकेश गंगवाल यांनी फेब्रुवारी २०२२ मध्ये राजीनामा दिला.

पाचवी फेल उद्योगपती, हजार कोटींचं विश्व उभारलं, कर्मचाऱ्यांना विसरला नाही, फ्लॅट आणि कार गिफ्ट
कार्यनीती जी बनली टर्निंग पॉईंट
कंपनीने आपल्या रणनीतीमध्ये अशा अनेक गोष्टींचा समावेश केला ज्यामुळे व्यवसायाला चालना मिळाली. उदाहरणार्थ इकॉनॉमी क्लासवर लक्ष केंद्रित करणे, इंधन बचतीचे धोरण, प्रवाशांना कमी खर्चात प्रवास करता यावा यासाठी प्रयत्नशील, पुरुषांऐवजी केबिन क्रूमध्ये महिलांचा समावेश कारण त्यांचे वजन कमी असते. या कारणांमुळे कंपनीने आपल्या ताफ्यात जास्तीत जास्त एअरबस ३२० चा समावेश केला आहे.

एकाच प्रकारची विमानं वापरून प्रशिक्षणाचा खर्च कमी करून इंधन वाचवण्याचे धोरण काम करत होते. हळूहळू कंपनीने मोफत जेवण, मनोरंजनासारखी सुविधा बंद केल्या ज्यामुळे खर्च कमी होऊन नफा वाढला. सुरूवातीनंतर इंडिगोने मोठ्या प्रमाणात विमानांची ऑर्डर देत २००५ मध्ये एअरबससोबत १०० विमानांचा करार करण्यात आला . एवढी विमाने एकत्र खरेदी केल्यामुळे कंपनीला कमीत कमी खर्च झाला. अनेक चढ-उतारानंतर इंडिगोने आपली वेगळी ओळख निर्माण केली. कंपनीची उल्लेखनीय वाढीत त्यांच्या शिस्तबद्ध दृष्टिकोनाचा महत्त्वाचा वाटा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here