भोपाळ : मध्य प्रदेशातील मुरैना शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे. मुरैना येथील खाद्य पदार्थ बनवणाऱ्या कंपनीत काम करणाऱ्या पाच जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर शहरात खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीनं घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी सर्व परिस्थितीची माहिती घेतली. दरम्यान, पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार मुरैना येथील साक्षी फूड प्रोडक्ट्स कंपनीत ही घटना घडली आहे. या ठिकाणी पाच जणांचा मृत्यू झाला. यामधील तीन जण हे सख्खे भाऊ आहेत. रक्षाबंधनाच्या दिवशी ही घटना घडल्यानं कंपनीतील सर्वांना धक्का बसला आहे.
तेव्हा शरद पवारांना पंतप्रधान करायचं होतं, आता योग्यवेळी अजितदादांना मुख्यमंत्री करायचंय: रामराजे निंबाळकर
उपविभागीय दंडाधिकारी भूपेंद्र सिंह कुशवाह यांनी मुरैनामध्ये आज एका कंपनीत टँकमधून निघणाऱ्या विषारी वायूच्या विळख्यात आल्यानं गुदमरुन पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली. सकाळी ११ वाजताच्या सुमारास कंपनीतील सेप्टिक टँकमधून गॅस गळती सुरु झाली होती. गळती रोखण्यासाठी दोन कामगार सेप्टिक टँकमध्ये उतरले होते. गॅसमुळं त्यांचा श्वास गुदरमरला आणि तब्येत बिघडली. यानंतर आणखी तीन जणांचा देखील मृत्यू झाला. यानंतर या सर्वांना तातडीनं जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथं जिल्हा सर्वसाधारण रुग्णालयाचे सर्जन गजेंद्र सिंह तोमर यांनी त्यांना मृत घोषित केलं. या प्रकरणाची चौकशी सुरु असल्याची माहिती त्यांनी दिली.
आशिया कपमध्ये सामना पाकिस्तानचा पण भारतीय संघाचा व्हिडिओ झाला व्हायरल, एकदा पाहा…

जिल्हाधिकारी अंकित अस्थाना यांनी या घटनेत ज्यांचा मृत्यू झाला त्यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला कंपनीत नोकरी आणि तात्काळ मदत म्हणून ५० हजार रुपयांची आर्थिक मदत देण्याचा निर्णय जाहीर केला.
Chandrayaan 3 : स्माइल प्लीज.., विक्रम लँडरची चंद्रावरील झलक, प्रज्ञान रोवरनं टिपला फोटो, ISRO कडून शेअर

शिरूरमध्ये एकाच वेळी ४ बिबट्यांचं दर्शन, २ वर्षांपासून मुक्तसंचार वाढला, हल्ल्यात ४ मृत्यू अनेक जण जखमी

17 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here