म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक: तिसऱ्या श्रावणी सोमवारनिमित्त त्र्यंबकेश्वर येथे ब्रह्मगिरीच्या फेरीसाठी हजारो शिवभक्त येत असतात. या भाविकांची ने-आण करण्यासाठी राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या नाशिक विभागाने तब्बल २५० जादा बसेसचे नियोजन केले आहे. याशिवाय एरवी दर पाच मिनिटाला नियमित सोडण्यात येणाऱ्या बसेसही या मार्गावर धावणार असल्याची माहिती विभाग नियंत्रक अरुण सिया यांनी दिली.

देशातील १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वराच्या दर्शनासाठी वर्षभर भाविकांची रीघ असते. श्रावणात ही गर्दी अनेकपटींनी वाढते. श्रावणातील सोमवारी ब्रह्मगिरी पर्वताला फेरी मारण्याचीही जुनी परंपरा आहे. जिल्ह्यातूनच नव्हे, तर राज्याच्या कानाकोपऱ्यातून दरवर्षी अगदी न चुकता हजारो भाविक ब्रह्मगिरीला फेरी मारण्यासाठी त्र्यंबकेश्वरला येत असतात. भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन त्र्यंबकेश्वरमध्ये खासगी वाहनांना २ ते ४ सप्टेंबर या कालावधीत प्रवेशबंदी करण्यात आली आहे. त्यामुळे त्र्यंबकेश्वरला जाण्यासाठी भाविकांना एसटी महामंडळाच्या बसेसचीच मदत घ्यावी लागणार आहे.

शेतकऱ्यांवरील संकटे दूर कर, धनंजय मुंडेंच प्रभू वैद्यनाथाला साकडं

भाविकांची गर्दी लक्षात घेऊन एसटी महामंडळाने जुन्या सीबीएस बस स्थानकातून तिसऱ्या श्रावणी सोमवारनिमित्त तब्बल २५० जादा बसेसचे नियोजन केले आहे. याशिवाय महामंडळाद्वारे दर पाच मिनिटांनी त्र्यंबकेश्वरसाठी बस सोडण्यात येते. या बसदेखील नियमितपणे सोडण्यात येणार असल्याची माहिती सिया यांनी दिली. त्र्यंबकेश्वरमध्ये पोहोचून ब्रह्मगिरीची परिक्रमा पूर्ण केल्यानंतर भाविकांना परतीचे वेध लागतात. त्यांच्या परतीच्या प्रवासासाठीही महामंडळाच्या बस सज्ज राहणार आहेत.

तिसऱ्या श्रावणी सोमवारी ब्रह्मगिरीला प्रदक्षिणा मारण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होते. त्यांची त्र्यंबकेश्वरला ने-आण करण्यासाठी आम्ही २५० बसेसचे नियोजन केले आहे. याशिवाय नियमित बसेसही या मार्गावर धावणार आहेत.

– अरुण सिया, विभाग नियंत्रक

Sharad Pawar: राज्य बँक, सिंचन घोटाळ्यांची चौकशी कराच, शरद पवारांचं पंतप्रधान मोदींना ओपन चॅलेंज

16 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here