राज्यात पुढचे चार ते पाच दिवस पावसाचे
भारतीय हवामान विभागानं जारी केलेल्या अंदाजानुसार राज्यात पुढच्या ४ ते ५ दिवसात पाऊस पडण्याची शक्यता आहे..बंगालच्या उपसागरात चक्राकार स्थिती निर्माण झाल्यानं तिथं येत्या ४८ तासात तेथे कमी दाबाचे क्षेत्र असेल. त्या स्थितीचा फायदा होऊन राज्यात पाऊस पडू शकतो.
हवामान विभागाच्या अंदाजनुसार ३ ते ७ सप्टेंबर या कालावधीत कोकण गोव्यात हलका-मध्यम पाऊस मेघगर्जना,विजांच्या कडकडाटासह पडेल तर काही मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर ५ ते ७ सप्टेंबरच्या दरम्यान मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात देखील पाऊस पडण्याची शक्यता आहे.
3 Sept:राज्यात पुढच्या 4,5 दिवसात पाउस शक्यता.बंगालच्या उपसागरात चक्राकार स्थिती, येत्या ४८ तासात तेथे कमी दाबाचे क्षेत्र.
3-7 Sept,#कोकण #गोव्यात हलका-मध्यम मेघगर्जना,विजांच्या कडकडाटासह काही मुसळधार पावसाची शक्यता
5-7 Sept दरम्यान #मध्यमहाराष्ट्र, #मराठवाडा, #विर्दभात पाउस
-IMD pic.twitter.com/nRkgvNxCGN
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) September 3, 2023
राज्यात कुठं पाऊस पडणार?
भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार येत्या पाच दिवसांमध्ये विदर्भात पाऊस हजेरी लावू शकतो. हवामान विभागानं पुढील पाच दिवसांसाठी विदर्भातील सर्व जिल्ह्यांना यलो अलर्ट दिला आहे. मराठवाड्यात देखील पावसाचं कमबॅक होऊ शकतं. मराठवाड्यात उस्मानाबाद, लातूर, नांदेड, जालना, परभणी हिंगोली, या जिल्ह्यांना देखील यलो अलर्ट देण्यात आला आहे.
कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात पाऊस
भारतीय हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार कोकणातील ठाणे रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना देखील यलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. पश्चिम महाराष्ट्रात पुणे आणि सातारा जिल्ह्यांना देखील यलो अलर्ट देण्यात आलेला आहे.
पावसाकडे लक्ष
राज्यासह देशात गेल्या १०० वर्षांमध्ये जे घडलं नाही ते ऑगस्ट महिन्यात घडलं. ऑगस्ट महिन्यात पावसानं उघडीप दिली. ऑगस्ट महिन्यात पावसाची तूट मोठी होती. त्यामुळं सप्टेंबर महिन्यात तरी पाऊस पडेल आणि दिलासा मिळेल, अशी शेतकऱ्याची आशा आहे.