मुंबई: मुंबई पोलिसांवर टीकाटिप्पणी व आरोप केल्यामुळं वादाच्या भोवऱ्यात सापडलेली बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावतचा सूर अखेर बदलला आहे. मुंबई व महाराष्ट्राबद्दल कृतज्ञता व्यक्त करत तिनं अखेर , असा नारा दिला आहे. त्यामुळं आता हा वाद शमण्याची चिन्हे आहेत.

‘गुंड व माफियांपेक्षा मला मुंबईची जास्त भीती वाटते’ असं म्हणणारी व सुशांतसिंह राजपूत प्रकरणात मुंबई पोलिसांवर आरोप करणारी हिच्यावर राजकीय, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातून टीकेची झोड उठली होती. कंगनाला मुंबई पोलिसांची भीती वाटत असेल तर तिनं आपल्या राज्यात निघून जावं, असा इशारा , मनसेनं दिला होता. तर, कंगनाला मुंबईत राहण्याचा अधिकार नाही, असं मत खुद्द गृहमंत्री अनिल देशमुख यांनी व्यक्त केलं होतं. सिनेक्षेत्रातील मंडळींनीही कंगनाला मुंबई व महाराष्ट्राबद्द कृतज्ञता बाळगण्याचा सल्ला दिला होता. अनेक सेलिब्रिटींनी थेट तिच्यावर टीका न करता ‘मुंबई मेरी जान’ म्हणत कंगनाला अप्रत्यक्ष तिच्या चुकीची जाणीव करून दिली होती.

मुंबईसह महाराष्ट्रात शिवसैनिक कंगनाविरोधात रस्त्यावर उतरले होते. तिच्या फोटोला ‘जोडे मारो’ आंदोलनही सुरू केलं होतं. ठाकरे सरकारमधील एका मंत्र्यानं कंगनाविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. कंगनानंही सुरुवातीला आव्हानाची भाषा केली होती. मात्र, प्रकरण चिघळण्याची शक्यता लक्षात घेऊन तिचा सूर अखेर बदलल्याचं दिसत आहे. तिनं ‘जय मुंबई, जय महाराष्ट्र’ असा नारा दिला आहे. कंगनाच्या वक्तव्यावरून निर्माण झालेल्या वादानंतर ट्वीटरवर #indiawithkanganaranaut असा एक ट्रेंड सुरू होता. त्याचा स्कीन शॉर्ट शेअर करत कंगनानं रात्री उशिरा एक ट्वीट केलं आहे.

वाचा:

आपल्या ट्वीटमध्ये तिनं पाठिंबा देणाऱ्या सर्वांचे आभार मानले आहेत. ती म्हणते, ‘महाराष्ट्रसह देशभरातील माझ्या सर्वच ठिकाणच्या मित्रांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. माझा हेतूबद्दल कोणालाही शंका नाही आणि माझी कर्मभूमी असलेल्या मुंबईबद्दलचं माझं प्रेम सिद्ध करण्याची गरज नाही. मला स्वीकारणाऱ्या मुंबईला मी नेहमीच यशोदा मातेचा दर्जा दिला आहे. जय मुंबई, जय महाराष्ट्र!’

वाचा:

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here