‘मला गुंड आणि मूव्ही माफियांपेक्षा जास्त भीती मुंबई पोलिसांची वाटते. मला हिमाचल प्रदेश किंवा केंद्र सरकारची सुरक्षा द्या. कृपा करून मुंबई पोलिसांची नको,’ असं तिनं म्हटलं होतं. त्यावरून जोरदार गदारोळ सुरू आहे. जवळपास सर्वच राजकीय पक्षांनी कंगनावर टीकेची झोड उठवली आहे. मनोरंजन क्षेत्रातील अनेक कलाकारांनीही ‘मुंबई मेरी जान’ असं म्हणत कंगनाला खडे बोल सुनावले आहेत. तर, राज्याचे गृहमंत्री यांनीही कंगनाला मुंबईत राहण्याचा अधिकार नाही, असं वक्तव्य केलं आहे.
वाचा:
सर्वच मीडियात सध्या कंगनाचा वाद गाजतो आहे. त्यावरून नीतेश राणे यांनी एक ट्वीट केलं आहे. ‘सावधान! सावधान! कंगना हा एक बहाणा आहे. आणि दिशा सालियनच्या प्रकरणावरून लक्ष विचलित करायचा हा प्रयत्न आहे. ‘बेबी पेंग्विन’ला वाचवायचे आहे. (हा बेबी पेंग्विन कोण याबद्दल त्यांनी स्पष्ट काहीही उल्लेख केलेला नाही) बाकी काही नाही,’ असं नीतेश यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, मुंबई पोलिसांवरील टीकेचं प्रकरण चिघळण्याची शक्यता लक्षात घेऊन कंगनानं आपला सूर मवाळ केला आहे. ‘माझी कर्मभूमी असलेल्या मुंबईवरचं प्रेम सिद्ध करण्याची मला गरज नाही. मुंबईनं मला यशोदा मातेसारखं प्रेम दिलं आहे. जय मुंबई, जय महाराष्ट्र असं तिनं म्हटलं आहे.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times