मुंबई : पीएसयू बँकांचे आधीच विलिनीकरण करून ही संख्या दहावर आणल्यानंतर आता भाजपचा डोळा ६ प्रमुख पीएसयू बँकाच्या निर्गुंतवणुकीकरणावर आहे, असा राष्ट्रवादीने केला आहे. या बँकांचं खासगीकरण करू नका, या बँका विकू नका, असं आवाहनही राष्ट्रवादीने केलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते यांनी हा आरोप केला आहे. ५ ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था देण्याचे आश्वासन आणि स्वप्न दाखविणारी भाजप सरकार आता देशाची संपत्तीचा लिलाव करीत आहे. ही राष्ट्र संपत्ती अनेक वर्षांच्या मेहनतीमुळे निर्माण झाली आहे आणि अजूनही बहुसंख्य ठेवीदारांचा सरकारी बँकांवर विश्वास आहे, असे महेश तपासे म्हणाले.

नोटबंदीचा चुकलेला निर्णय आणि जीएसटीची नियोजन शून्य अंमलबजावणीमुळे आपली अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झाली आणि आता करोना साथीने त्याला पार खोलवर गाडून टाकले आहे. बिघडलेल्या अर्थव्यवस्थेचे परिणाम आता सर्वांनाच जाणवत आहे. रोजगार निर्मिती आणि आर्थिक विकास यासारख्या मुख्य मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी भाजप सरकारने भावनिक विषयांवर आपली भूमिका बजावल्या आहेत, असा आरोपही तपासे यांनी केला आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here