आयपीएलचे आयोजन करताना वातावरणाचा विचार करणेही महत्वाचे असते. युएईमध्ये सर्वात जास्त उष्ण वातावरण हे अबुधाबी येथे आहे. त्यामुळे अबुधाबी येथे बीसीसीआयला जास्त सामने खेळवायचे नाहीत. कारण अबुधाबीला जास्त सामने खेळवले तर त्याचा विपरीत परीणाम खेळाडूंवर होऊ शकतो, असे म्हटले जात आहे. त्यामुळेच बीसीसीआयला आयपीएलचे वेळापत्रक बनवण्यासाठी वेळ लागत असल्याचे म्हटले जात आहे. पण चाहत्यांना मात्र आयपीएलच्या वेळापत्रकाची उत्सुकता लागून राहीलेली होती.
आयपीएलचे वेळापत्रक बनवण्यात बीसीसीआयला काही समस्या जाणवत होती. पहिली गोष्ट तर करोनाचं संकट तर आहेच. पण त्याचबरोबर सर्वात युएईमध्ये सध्याच्या घडीला उष्म वातावरणार आहे. त्यामुळे कडक गर्मी जाणवत आहे. त्यामुळेच खेळाडूंनी दुपारी सराव न करण्याचाही निर्णय घेतला आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times