कोलंबो: पाकिस्तान आणि त्यांची मैदानावरील खराब फिल्डिंग यांचं जुनं नातं आहे. खराब फिल्डिंगचा अजून एक नमुना भारत विरुद्ध पाकिस्तानच्या सामन्यात पाहायला मिळाला. मैदानावर विचित्र पद्धतीने झेल सोडण्यासाठी कुख्यात असलेल्या पाकिस्तानी संघाला रविवारी भारताविरुद्ध पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय स्तरावर नामुष्की आली. आशिया चषकातील सुपर फोरमधील त्यांच्या पहिल्या सामन्यात यष्टीरक्षकासह तीन क्षेत्ररक्षक पाहतच राहिले आणि त्यांच्या डोळ्यांसमोरून चेंडू गेला. शुभमन गिलचा हा झेल सोडणे बाबर आझमच्या आर्मीला महागात पडले, कारण जबरदस्त फलंदाजी करणाऱ्या या फलंदाजाने भारताच्या मोठ्या धावसंख्येचा पाया रचला.क्षेत्ररक्षक पाहतच राहिलेवेगवान गोलंदाज नसीम शाह पाकिस्तानसाठी आठवे षटक टाकत होता. बॅकफूटवरून डीप पॉइंटच्या दिशेने पहिल्याच चेंडूवर शुभमन गिलने शानदार चौकार मारला. ऑफ स्टंपच्या बाहेर टाकलेला पुढचा चेंडू त्याने जाऊ दिला. मात्र तिसऱ्या चेंडूवर शुभमन गिलला ३० धावांवर पाकिस्तानने सहज जीवदान दिले. हा चेंडूही ऑफ स्टंपच्या बाहेर फेकला गेला, जो गिलने दूरवरून कट मारण्याचा प्रयत्न केला. बॅटची बाहेरची धार घेत, चेंडू दोन स्लिप क्षेत्ररक्षकांमध्ये गेला आणि या दोघांनीही काहीच न करता चेंडूकडे बघत बसले आणि तो चार धावांसाठी थर्ड मॅन बाऊंड्रीबाहेर गेला. यावेळी आगा सलमान आणि इफ्तिखार अहमद स्लिपमध्ये उभे होते तर यष्टिरक्षक मोहम्मद रिझवान देखील चेंडूच्या दिशेने गेला, कदाचित यामुळे तिघांमध्ये गोंधळ झाला आणि एकानेही चेंडू झेलला नाही. यावरूनच पुन्हा एकदा पाकिस्तानची खराब फिल्डिंग पाहायला मिळाली. गिलने शाहीनची केली धुलाई या सामन्यात शुभमन गिल वेगळ्या अंदाजात दिसला. भारतीय संघासाठी डोकेदुखी ठरलेल्या डावखुरा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीला त्याने बेदम फटकेबाजी केली. पहिल्या १० षटकांत शाहीनने १२ चेंडूंत सहा चौकारांच्या मदतीने २४ धावा केल्या. शाहीनला ताबडतोड फटकेबाजी करताना पाहून पाकिस्तानी कॅम्पमध्ये घबराट पसरली होती. कर्णधार बाबर आझमला काय करावे समजत नव्हते. शुभमन गिलने १३व्या षटकात ३७ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. रोहितची बॅट पण तळपली या सामन्यात भारतीय कर्णधारही हिटमॅन अवतारात दिसला होता. तो केवळ चौकार आणि षटकारांमध्येच बोलत होता. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की रोहित शर्माने ११व्या षटकात सामन्यातील पहिली एक धाव घेतली. रोहित शर्माने ४२व्या चेंडूवर षटकार ठोकून ५०वे वनडे अर्धशतक पूर्ण केले. शादाब खानला हिटमॅनने रिमांडवर घेतले होते. बाबर आझमला १३व्या षटकात प्रथमच फिरकीपटूला आणणे महागात पडले कारण रोहितने शादाब खानच्या शेवटच्या तीन चेंडूंवर सलग दोन षटकार आणि एक चौकार मारला. रोहित ४९ चेंडूत ५६ धावा करून बाद झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here