बुलढाणा: खाकी वर्दी म्हटली की त्यासोबत अनेक जबाबदाऱ्या येतात पण या खाकी वर्दीवरच ज्या गुन्हेगार आणि आरोपींना गजाआड करण्याची जबाबदारी असते तेच गुन्हेगार होतात तेव्हा खाकी वर्दीची मान शरमेने खाली जाते असेच म्हणावे लागेल. नेमका बुलढाण्यात काय असं घडलं जाणून घेऊया.

बुलढाण्यात फसवणूक तसेच खंडणी उकळल्याप्रकरणी बुलढाणा शहर पोलीस ठाण्यातील तीन पोलीस कर्मचाऱ्यांसह अन्य तीन आरोपींविरोधात विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आला आहे. यामुळे जिल्हा पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. यामध्ये पोलीस कर्मचारी प्रकाश दराडे, गजानन मोरे, दत्तात्रय नागरे आणि विशाल पंडितराव मोहिते, अजय रामसिंग परदेशी, शुभम जीवन पांडे अशी आरोपींची नावं असून यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. प्लॉट खरेदीचा व्यवहार प्रकरणात ४० लाख उकळल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे.

या सर्व आरोपींविरोधात जालना जिल्ह्यातील राजूर येथील मयूर हाजबे यांनी तक्रार दिली होती. बुलढाणा शहरातील धाड नाका परिसरात मयूर हाजबे यांना प्लॉट खरेदी करून देतो म्हणून या आरोपींनी त्यांना विश्वासात घेतले. इसार पावतीचे चार लाख रुपये देखील आरोपींनी घेतले होते. त्यानंतर मात्र मयूर हाजबे यांना प्लॉट बाबत झुलवत ठेवण्यात आले. मात्र मयूर हाजबेला पैसे परत करावे लागतील म्हणून आरोपींनी शक्कल लढवत त्यालाच अवैध बंदूक बाळगल्याप्रकरणात जेलमध्ये टाकण्याचा सापळा रचून भीती दाखविण्याचे ठरवले.

काॅन्स्टेबलकडून ३ प्रवासी अन् एका पोलीसावर गोळीबार; जयपूर-मुंबई एक्सप्रेसमध्ये थरकाप उडवणारी घटना

यामध्ये आरोपी पोलिसांनी शुभम पांधे याला मध्यस्थी ठेवून याप्रकरणी पोलिस प्रकाश दराडे, गजानन मोरे यांच्यासह दत्तात्रय नागरे यांच्या मदतीने षडयंत्र रचण्यात आले. मयूर हाजबेला गजाआड करण्याची भीती दाखवून खंडणी उकळण्याचा प्रयत्न करण्यात आला. तसेच त्याच्याकडून रिकामा बॉण्डपेपर, रिकामा चेक आणि इतर कागदपत्रे देखील घेण्यात आली.

आरोपी शुभम पांडे यांचे बँक अकाउंट २० लाख रुपये टाकण्यात आले आणि चेक बाऊन्स झाला असल्याचे दाखवत त्यावर खोटी सही करून पुन्हा २० लाख रुपये उकळण्यात आले. या सगळ्या प्रकरणात या तिन्ही पोलिसांनी आरोपींना मदत केली आहे. याप्रकरणी आरोपींविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात पोलीस कर्मचारी प्रकाश दराडे, मोरे ,नागरे आणि विशाल पंडितराव मोहिते, अजय रामसिंग परदेशी, शुभम जीवन पांडे सर्व राहणार धाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एकीकडे जालन्यामध्ये घडलेल्या घटनेमध्ये पोलिसांनी केलेल्या लाठीमारामध्ये सरकारला माफी मागावी लागली आहे. या प्रकरणामध्ये थेट पोलिसांवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असताना आता थेट अशा संवेदनशील गुन्ह्यांमध्ये पुन्हा एकदा पोलीस दलाला अडचणीत आणल्याचे बोलले जात आहे.

Dahanu News: थेट रस्त्यावर उतरत आमदार विनोद निकोलेंनी पोलिसांना फैलावर घेतलं, सर्वांदेखत अधिकाऱ्याला झापलं

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here