मुंबई : यंदाच्या गणेशोत्सवासाठी काहीच दिवस राहिले आहेत. गणपतीच्या भक्तांना गणेश चतुर्थीचे वेध लागले आहेत. यंदा गणेश चतुर्थी १९ सप्टेंबरला असून त्यादिवसापासून पुढील १० दिवस भक्तांसाठी आनंदाची पर्वणी असेल. मुंबईत दरवर्षीप्रमाणं यंदा देखील मूर्तीशाळेतून मोठमोठ्या मंडळांच्या मूर्ती एक आठवडाभर अगोदरच मंडपात दाखल झाल्या आहेत. ९ आणि १० सप्टेंबरला मोठमोठ्या मंडळांच्या मूर्ती मंडपात उत्साहाच्या वातावरणात आणण्यात आल्या.

लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाकडून यंदा मोठा निर्णय घेतला आहे. मंडळानं तब्बल २६.५ कोटी रुपयांचं विमा संरक्षण ५ लाख ४० हजारांचा विमा हप्ता भरुन घेतलं आहे. हा विमा न्यू इंडिया अश्यूरन्स कंपनीकडून उतरवण्यात आला आहे.

२६.५ कोटींच्या विमा संरक्षणात नेमकं काय?

लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाकडून दोन महिन्यांच्या कालावधीसाठी विमा उतरवण्यात आला आहे. २४ ऑगस्ट ते २३ ऑक्टोबर या दोन महिन्यांसाठी हे विमाकवच घेण्यात आलं आहे. कोणत्याही प्रकारचा अपघात झाल्यास त्यासाठी १२ कोटींचं विमा संरक्षण घेण्यात आलं आहे. विजेच्या उपकरणांसाठी किंवा इतर गोष्टींमुळं हानी झाल्यास त्यासाठी अडीच कोटींचं विमा संरक्षण असेल. लालबागच्या राजाच्या गणेश मूर्तीचे दागिने आणि इतर मौल्यवान वस्तूंसाठी ७ कोटी ४ हजार रुपयांचं विमा संरक्षण घेण्यात आलं आहे. तर, याशिवाय प्रसादातून विषबाधा अशा प्रकारच्या घटनांसाठी ५ कोटींचं विमा संरक्षण घेण्यात आलं आहे.

१२ कोटींच्या विमा संरक्षणामध्ये गणपतीचे भक्त,मंडळाचे विश्वस्त, नोंदणीकृत कार्यकारी सदस्य, स्वंयसेवक, स्थानिक रहिवासी, संरक्षण कर्मचारी, वॉचमन यांचा वैयक्तिक अपघात विमा काढण्यात आला आहे. एखादी अप्रिय घटना घडल्यास ५ लाखांची भरपाई मिळणार आहे. लालबागचा राजा मंडळाकडून ज्यांना ओळखपत्र दिली जातील ते यासाठी पात्र असतील, असं मंडळाचे खजिनदार मंगेश दळवी यांनी सांगितलं.

बसमध्ये विदेशी पर्यटक,चाकातून धूर निघू लागताच वेगळीच चर्चा, चालकानं तपासणी करताच प्रवाशांचा जीव भांड्यात पडला

गणेश भक्तांच्या पंढरीत उत्साह, चिंचपोकळीच्या चिंतामणीचा आगमन सोहळा दिमाखात

लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाकडून यासाठी ५ लाख ४० हजार रुपयांचा विमा हप्ता भरण्यात आला आहे. गेल्यावर्षी मंडळानं २५. ६ कोटी रुपयांचं विमा संरक्षण घेतलं होतं. गतवर्षी त्यासाठी ५ लाख २० हजार रुपये मंडळाकडून खर्च करण्यात आले होते.

पुण्यातून मनसेचा पहिला खासदार निवडून आणायचा, राज ठाकरेंनी घरच्या माणसावर टाकली मोठी जबाबदारी

दरम्यान, लालबाग परळ भागात शनिवारी आगमन सोहळ्याच्या निमित्तानं भायखळा ते लालबाग चिंचपोकळी येथे मोठ्या संख्येनं गणेशभक्त जमले होते. चिंचपोकळीचा चिंतामणी गणपतीच्या आगमन सोहळ्यासाठी भायखळा येथील मूर्तीशाळा ते मंडपापर्यंत मोठ्या संख्येनं गणेशभक्त जमले होते.
धनंजय मुंडे म्हणाले, बरगड्या मोडतील-नादाला लागू नका, जितेंद्र आव्हाडही नडले, कोथळा काढण्याचा इशारा!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here