नवी मुंबई: सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख करून प्रेमाच्या जाळ्यात अडकल्याच्या अनेक घटना ह्या दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. त्यात प्रेम करणारे हे दोघेही सोशल मीडियावरूनच एकमेकांना ओळखत असतात. प्रेमसंबंधातून एकमेकांना भेटणे हे सुरू होते आणि अनेक वेळा मग लैंगिक अत्याचारासारख्या घटनांना बळी पडावे लागते. सोशल मीडिया जेवढे चांगले तेवढेच वाईट देखील आहे. अनेक वेळा त्याचा गैरवापर केल्याचा प्रकार घडला जातो आणि मग अनेक महिलांना अत्याचाराच्या वेगवेगळ्या घटनांना बळी पडावे लागते. अशी एक घटना नवी मुंबईतून समोर आली आहे.
नात्याला काळीमा फासणारे कृत्य! घरात कोणी नसल्याचा फायदा घेत सख्ख्या भावाचे अल्पवयीन बहिणीसोबत कुकर्म
मिळालेल्या माहितीनुसार, कोचिंग क्लासेस चालवणाऱ्या एका व्यक्तीने ३० वर्षीय महिलेवर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. कर्नाटक राज्यातील एका ३० वर्षीय महिलेवर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. रबाळे एमआयडीसी पोलिसांनी सदर व्यक्तीविरोधात अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणातील आरोपी व्यक्ती बोरिवली येथे राहण्यास आहे. तर पीडित महिला कर्नाटक राज्यात राहणारी आहे.

आरोपी व्यक्ती खाजगी क्लासेस चालवत असून आरोपीचे आणि पीडित महिलेची वर्षभरापूर्वी सोशल मीडियाद्वारे ओळख झाली होती. त्यानंतर त्यांच्यात मैत्री होऊन प्रेमसंबंध निर्माण झाले होते. या दरम्यान आरोपीने पीडित महिलेला आपल्या क्लासेसमध्ये पार्टनरशिप देण्याचे आमिष दाखविले होते. त्यानंतर आरोपीने या महिलेला रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत बोलवून तिच्यावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केले होते. याबाबत पीडित महिलेने शनिवारी रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी आरोपी विरोधात लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले आहे.

मुख्यमंत्र्यांचा निर्णय चुकीचा, पश्चिम महाराष्ट्रातील मराठ्यांनी काय घोडं मारलंय; पृथ्वीराज चव्हाणांचा संताप

अनेक वेळा पोलीस देखील सांगतात की सोशल मीडियाचा वापर योग्य पद्धतीने करा. मात्र याकडे अनेकांचे दुर्लक्ष करून सोशल मीडियाचा वापर जास्त पद्धतीने करून वेगवेगळ्या अत्याचाराच्या घटनाना बळी पडल्याची अनेक उदाहरणे पाहायला मिळतात. त्यामुळे प्रत्येकानेच सोशल मीडियाचा वापर अयोग्य पद्धतीने न करता गरजेप्रमाणे करा असे वेळोवेळी आवाहन केले जाते. त्याकडे लक्ष दिले तर अनेक अत्याचाराच्या घटनांना आळा बसेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here