कोलंबो: आशिया कपच्या सुपर-४ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढत सुरु आहे. काल पावसामुळे थांबवण्यात आलेला सामना आज दुसऱ्या दिवशी पुन्हा सुरू झाला. पाकिस्तान संघाला पावसाची आणि खेळपट्टीची मदत मिळेल अशी अशा होती. पण विराट कोहली आणि केएल राहुल यांनी पाकच्या गोलंदााजांची अशी धुलाई केली ज्याने चेंडू कसा आणि कुठे टाकू अशा प्रश्न पडला होता. विराट आणि राहुल यांच्या नाबाद द्विशतकी भागिदारीमुळे भारताने पाकिस्तानसमोर डोंगराऐवढे आव्हान ठेवले आहे. या दोघांनी वैयक्तीक शतक केली पण त्याच बरोबर अनेक विक्रम देखील केले.

विराट कोहलीने ९४ चेंडूत ३ षटकार आणि ९ चौकारांसह नाबाद १२२ धावा केल्या. तर केएल राहुलने १०६ चेंडूत २ षटकार आणि १२ चौकारांसह नाबाद १११ धावा केल्या. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी नाबाद २३३ धावांची भागिदारी केली. त्यांच्या खेळीत अनेक विक्रम देखील झाले.

पाकिस्तानविरुद्ध विराट कोहलीचा ऐतिहासिक वर्ल्ड रेकॉर्ड; सचिनला मागे टाकले, अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
१) विराट कोहलीने या सामन्यात एक मोठा विक्रम केला. वनडे क्रिकेटमधील हे त्याचे ४७वे शतक ठरले. या खेळी दरम्यान त्याने या कॅलेंडर वर्षात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १ हजार धावा पूर्ण केल्या इतक नाही तर ९८वी धाव घेताच त्याने वनडेमध्ये १३ हजार धावांचा टप्पा पार केला. सर्वात कमी डावात १३ हजार धावा करण्याचा विक्रम विराटने स्वत:च्या नावावर केला. हा विक्रम आधी सचिनच्या नावावर होता. तर सचिननंतर अशी कामगिरी करणारा तो दुसरा भारतीय ठरला आहे. सचिनने यासाठी ३२१ डावा खेळले तर विराटने २६७ डावात १३ हजार धावा केल्या.

२) केएल राहुलचे वनडे क्रिकेटमधील हे सहावे तर पाकिस्तानविरुद्धचे पहिले शतक ठरले. गेल्या काही काळापासून दुखापतीमुळे संघाबाहेर असलेल्या राहुलने या शतकासह दमदार कमबॅक केले आहे.

३) विराट-राहुल या तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या फलंदाजांनी वैयक्तीक शतक देखील केली. भारतासाठी वनडे क्रिकेटमध्ये तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाच्या फलंदाजांनी शतक करण्याची ही फक्त तिसरी वेळ आहे. याआधी १९९९ साली राहुल द्रविड आणि सचिन तेंडुलकर यांनी केनियाविरुद्ध अशी कामगिरी केली होती. त्यानंतर २००९ साली गौतम गंभीर आणि विराट कोहली या जोडीने श्रीलंकेविरुद्ध शतक झळकावले होते.

भारत विरुद्ध इंडिया वादात सुनील गावस्करांची उडी; म्हणाले, चांगली गोष्ट, मात्र बदल केला तर तो….

४) आशिया कपमध्ये सर्वाधिक शतक करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत विराट आता संयुक्तपणे दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. त्याचे हे स्पर्धेतील चौथे शतक ठरले. तो श्रीलंकाच्या कुमार संगकारासह दुसऱ्या स्थानावर आहे. सहा शतकांसह सनथ जयसूर्या पहिल्या स्थानावर आहे.

५) विराट-राहुल जोडीने २३३ धावांची भागिदारी केली. आशिया कपमधील ही सर्वोच्च भागिदारी ठरली आहे. त्यांनी पाकिस्तानच्या मोहोम्मद हाफिज आणि जमशेद या जोडीने २०१२ साली केलेल्या २२४ धावांच्या भागिदारीचा विक्रम मागे टाकला.

६) कोलंबोच्या प्रेमदासा स्टेडियमवर विराटने गेल्या चार वनडेत नाबाद १२८, १३१, नाबाद ११० आणि नाबाद १२२ अशा धावा केल्या आहेत.

७) विराट-राहुल जोडीने केलेल्या २३३ धावा ही भारताची वनडे क्रिकेटमधील दुसऱ्या क्रमांकाची सर्वोच्च भागिदारी आहे. तर पाकिस्तानविरुद्धची पहिल्या क्रमांकाची होय. याआधी नवज्योत सिद्धू आणि सचिन तेंडुलकर यांनी १९९६ साली २३१ धावा केल्या होत्या.

८) वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळांडूच्या यादीत विराट पाचव्या स्थानावर आहे. त्याच्यापुढे सचिन तेंडुलकर- १८ हजार ४२६,कुमार संगकारा- १४ हजार २३४, रिकी पॉन्टिंग- १३ हजार ७०४, सनथ जयसूर्या- १३ हजार ४३० हे चार खेळाडू आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here