जालना: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे यांच्या प्रकृतीबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आजचा १५ वा दिवस आहे. मराठा आरक्षणाच्या जीआरमध्ये सरकारने सुधारणा न केल्याने मनोज जरांगे यांनी पाणी आणि सलाईन बंद केले होते. मनोज जरांगे यांनी रविवारी सकाळपासून पाणी आणि सलाईनचा त्याग केला होता. यामुळे मनोज मनोज जरांगे पाटील यांना थकवा आणि अशक्तपणा आला होता. तरीही मनोज जरांगे हे वैद्यकीय तपासणी करुन घ्यायला आणि सलाईन लावून घेण्यास विरोध करत होते. मात्र, त्यांची ढासळत चाललेली प्रकृती पाहून अंतरवाली सराटी येथील गावकऱ्यांनी जरांगे यांच्याकडे सलाईन लावण्याचा आग्रह धरला. हा आग्रह मान्य करत मनोज जरांगे पाटील यांनी सलाईन लावून घेतले. डॉक्टरांच्या पथकाने सोमवारी रात्री साडेबारा वाजता तपासणी करुन, जरांगे पाटील यांना सलाईन लावले. मंगळवारी सकाळी १० वाजता जरांगे पाटील पत्रकार परिषद घेणार आहेत. तर दुपारी दोन वाजता ते सर्व समाजबांधवांसोबत बैठक घेऊन निर्णय घेणार आहेत. यावेळी ते काय भूमिका घेतात, हे पाहावे लागेल.

माझं गाव भावनिक झालं आहे. गावातील महिला रडत आहेत, ते जरा काळजाला लागतंय. माझ्यात निर्णय घ्यायची क्षमता राहिलेली नाही. सरकारला वेळ का पाहिजे हे कळले पाहिजे. सरकारने योग्य कारण दिलं तर दोन काय चार पावले मागे यायला तयार आहे. पण मराठा समाजाला खरंच आरक्षण देणार का, याचं उत्तर सरकारने दिलं पाहिजे, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले.

पाणीत्याग आणि सलाईन बंद, उपोषणाच्या १४ व्या दिवशी जरांगेंना अशक्तपणा, आंदोलनस्थळी निपचित पडून

ढासळत्या प्रकृतीवर आरक्षण हाच उपाय: जरांगे पाटील

मराठा समाजाने ७५ वर्षे अन्याय सहन केला आहे, आता माघार नाही, आरक्षण मिळत नाही हेच दुखणे आणि आरक्षण हाच आपल्या प्रकृतीवर उपाय असल्याचे मनोज पाटील जरांगे यांनी सोमवारी रात्री सांगितले. दरम्यान, सोमवारी दिवसभरात सरकारकडून कोणत्याही प्रकारचा संपर्क झाला नसल्याचे जरांगे पाटील यांनी सांगितले.

Maratha Reservation: आम्ही मराठा समाजाला काहीही थातुरमातूर देणार नाही, आरक्षणाबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य

अंतरवाली सराटीत जरांगे यांच्यावर वैद्यकीय उपचार आणि तपासणी करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना त्यांनी तपासण्या करण्यास स्पष्ट नकार दिला. दरम्यान, सोमवारी दिवसभरात वैद्यकीय अधिकाऱ्यांचे चार वेळा पथक येऊन परत गेले. जरांगे पाटील म्हणाले, की मराठा आरक्षण मिळत नाही हेच खरे दुखणे आहे. सर्व राजकीय पक्षांनी मराठा समाजास सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतला पाहिजे. कारण, मराठा समाजाने गेल्या पंच्याहत्तर वर्षे संबंधित सर्वांना भरभरून दिले आहे. दरम्यान, अंतरवाली सराटीत जरांगे यांना भेटण्यास सोमवारी मोठ्या संख्येने त्यांचे समर्थक जमले होते.

माझी लेकरं संकटात, सर्व पक्षांनी मिळून ताकद उभी करा | मनोज जरांगे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here