जालना : मराठा आरक्षणाबाबत सरकार गंभीर आहे, असं ठासून सांगणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा एक व्हिडीओ समाज माध्यमांवर व्हायरल होतोय. ज्यावरून सरकार आरक्षणाबाबत गंभीर नसल्याची भावना नागरिक व्यक्त होत आहे. त्याचं झालं असं की… मराठा आरक्षणासाठी सोमवारी रात्री सर्वपक्षीय बैठक झाल्यानंतर पत्रकार परिषद सुरू होण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी बोलून मोकळं व्हायचं अन् निघून जायचं अशा आशयाचं वक्तव्य केलं. ज्यावरून मनोज जरांगे पाटलांनी संताप व्यक्त करत एक महिन्याचा वेळ दिलाय. जर आरक्षण दिलं नाही तर त्यांना महागात पडेन, असा इशाराच त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिला. खासदार ओमराजे निंबाळकर, सुप्रिया सुळे, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर टीकेची झोड उठवली. तर, एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणावर प्रसिद्धीपत्रकाद्वारे सरकारची बाजू मांडली आहे.

मराठा आरक्षणाबाबत सरकार गंभीर आहे असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सातत्याने सांगत आहेत. तसेच जरांगे पाटलांना उपोषण सोडण्याची विनंतीही करत आहेत. पण आरक्षणाविषयीच्या बैठकीत झालेल्या निर्णयाची माहिती देताना बोलून मोकळं व्हायचं अन् निघून जायचं, असं वक्तव्य खुद्द मुख्यमंत्र्यांनी केल्याने विरोधकांनी त्यांच्यावर सडकून टीका केली आहे.

शिंदे-फडणवीस अजित पवार यांच्यातला संवाद काय?

एकनाथ शिंदे – आपल्याला काय? बोलायचं अन् निघून जायचं, बोलून मोकळं व्हायचं.
अजित पवार – हो……येस
देवेंद्र फडणवीस – माईक चालू आहे.

आरक्षण देण्याची दानत नसेल तर तसे सांगा… : ओमराजे निंबाळकर

मराठा आरक्षणासाठी काल रात्री सर्वपक्षीय बैठक झाल्यानंतर पत्रकार परिषद सुरू होण्यापूर्वी सरकारमधील या तीन प्रमुख नेत्यांतील संवाद तरी पाहा. “आपण बोलून मोकळं व्हायचं” हे त्यांचे उद्गार मराठा आरक्षण प्रश्नी त्यांची असलेली अनास्था दर्शवित आहे. मराठा आरक्षणासाठी सर्व समाजबांधव पोटतिडकीने राज्यभर आंदोलन करीत आहेत. अनेकांनी अन्नत्याग केला आहे. विविध माध्यमातून राज्य सरकारला जागे करण्याचा प्रयत्न आपला मराठा तरुण करताना दिसतो आहे. तरीही हे सरकार केवळ वेळकाढूपणा करीत आहे. एकीकडे समाज जीवन मरणाचा संघर्ष शांततेच्या माध्यमातून करीत असताना सरकारचे हे ट्रीपल इंजिन बघा किती गांभीर्याने हा विषय घेत आहेत.. आरक्षण देण्याची दानत नसेल तर तसे सांगा पण, किमान जखमेवर मीठ तरी चोळू नका. समाज आता तुमच्याकडे डोळसपणे बघतोय…

अडचणीच्या प्रश्नांपासून पळवाट शोधणारे नाकर्ते सरकार : विजय वडेट्टीवार

सरकारला फक्त बोलून मोकळं व्हायचं आहे. जनतेच्या प्रश्नांना- समस्यांना उत्तरे द्यायचे नाही. अडचणीच्या प्रश्नांपासून पळवाट शोधणारे नाकर्ते सरकार राज्याचा कारभार हाकत आहे, अशा शब्दात राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारला लक्ष्य केलंय.

शेवटी मनातलं ओठांवर आलं : सुप्रिया सुळे

…शेवटी मनातलं ओठांवर आलं. यावरुन कळतेय की हे सरकार जनतेच्या प्रश्नांबाबत प्रचंड असंवेदनशील आहे. जनता ही आपली माय-बाप पण तरीही त्यांना जनतेच्या प्रश्नांबाबत थोडीही काळजी नाही. हे त्यांच्या वागण्यातून दिसून येते.

कर्जदारांसाठी आनंदाची बातमी; RBIने घेतला मोठा निर्णय, आता बँकांची मनमानी नाही चालणार

एकनाथ शिंदे काय म्हणाले?

मराठा आरक्षणविषयक सर्वपक्षीय बैठकीनंतर सह्याद्री अतिथिगृह येथे पत्रकार परिषदेपूर्वी आपला आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांचा माईकवरील संवाद ‘सोशल मीडीया’वरून चुकीच्या पध्दतीने संपादित करुन फिरविणे अत्यंत खोडसाळपणाचे आहे.
भारताविरुद्ध फायनल मॅच कोण खेळणार? जाणून घ्या कोणाचा पत्ता कट होणार, असे आहे समीकरण
मराठा आरक्षणाबाबत सरकार सुरुवातीपासून संवेदनशील असून कायद्याच्या चौकटीत बसेल असे आरक्षण देण्याबाबत सरकार प्राधान्याने काम करीत आहे. तसेच मराठा आरक्षणाबाबत पहिल्यांदाच अशा सर्व पक्षांच्या नेत्यांना एकत्र बोलावून या विषयी त्यांचे एकमत घेण्यात आले आहे. शासनाने इतकी चांगली भूमिका घेतली असतांना मुद्दामहून काही विरोधक खोडसाळपणे आणि व्हिडीओ क्लिप चुकीच्या पद्धतीने संपादित करून लोकांच्या मनात गैरसमज पसरविण्याचे काम करीत आहेत हे अतिशय निंदनीय आहे. आमच्या एकमेकांमधील संवादाची मोडतोड करून संपादित करून दाखवून या घटकांनी जाणीवपूर्वक निंदनीय कृत्य केले आहे. शासन एकीकडे या संवेदनशील विषयावर ठोस भूमिका आणि निर्णय घेत आहे. अशा पार्श्वभूमीवर समाजात सोशल मीडियातून गैरसमज निर्माण करण्याचा कृत्याचा निषेध करावा तेवढा कमीच आहे, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

Maratha Protest: मला वडिलांची अन् आरक्षणाचीही काळजी, मनोज जरांगेची लेक रस्त्यावर, बुलढाण्यातील मोर्चात आक्रमक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here