मुंबई: भाजप आमदार राम कदम यांच्या मतदारसंघात अंगावर कंबल टाकून विकलांग व्यक्तींवर उपचार करणाऱ्या राजस्थानातील कंबल-बाबांवर जादूटोणा विरोधी कायद्याखाली कारवाई करण्याची महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे मागणी केली आहे. गेल्या काही दिवसांपासून कंबल बाबामुळे राम कदम चांगलेच चर्चेत आहेत. राम कदम यांनी कंबल बाबांना मुंबईत पाचारण केले आहे.

नोटांवर कोणाचे फोटो असावेत? राम कदमांकडून ४ फोटो ट्विट; तिघांचं महाराष्ट्राशी थेट नातं

आपल्या मतदारसंघातील विकलांग नागरिकांवर उपचार करण्यासाठी कंबल बाबा यांना बोलावल्याचे राम कदम यांचे म्हणणे आहे. ज्यांना अर्धांगवायूचा झटका येऊन शरीर लुळे पडले आहे किंवा ज्यांना कंबर आणि गुडघ्याचे दुघणे आहे, त्यांनी याठिकाणी येऊन उपचार घ्यावेत, असे आवाहन राम कदम यांनी केले होते. या आवाहनानंतर लोकांनी कंबल बाबांकडून उपचार करवून घेण्यासाठी बरीच गर्दी केली होती. कंबल बाबांकडून नागरिकांवर होणाऱ्या उपचाराचे व्हीडिओ राम कदम यांनी स्वत:च्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेअर केले आहेत. हे व्हिडिओ चांगलेच व्हायरल झाले असून त्याची प्रचंड चर्चा आहे.

तुनिषा शर्मा प्रकरण लव्ह जिहादचं असेल तर… राम कदम स्पष्टच बोलले

मात्र, आता अंधश्रद्धा निर्मुलन समितीने कंबल बाबांवर कारवाई करण्याची मागणी केल्याने आमदार राम कदम काय भूमिका घेतात, हे पाहावे लागेल. अंनिसकडून कंबल बाबांवर सडकून टीका करण्यात आली आहे. कंबलबाबा या नावाने ओळखला जाणारा राजस्थानातील एक भोंदू बाबा आमदार राम कदम यांच्या आधाराने त्यांच्या मतदारसंघातील विकलांग लोकांवर कंबल टाकून तथाकथित उपचार करत असल्याचे अनेक व्हिडिओ राम कदम यांच्या फेसबुक वॉलवर बघायला मिळतात. भोंदूबाबा करत असलेल्या या उपचारांच्या वेळी स्वतः आमदार राम कदम तसेच पोलीस अधिकारी देखील उपस्थित असलेले दिसतात. गेली १० वर्षे महाराष्ट्रात जादूटोणा विरोधी कायदा अस्तित्वात आहे. या कायद्यानुसार स्वतःच्या अंगात दैवी शक्ती असल्याचा दावा करणे, चमत्कार करण्याचा दावा करणे हा दखलपात्र व अजामीनपात्र गुन्हा आहे. आजवर जवळपास १००० पेक्षा अधिक भोंदू बाबांवर या कायद्याच्या अंतर्गत गुन्हे दाखल झालेले आहेत. वर उल्लेख केलेल्या कंबलबाबा या भोंदूबाबावर देखील पोलिसांनी जादूटोणा विरोधी कायद्याच्या अंतर्गत तत्काळ गुन्हा दाखल करावा व पीडित व्यक्तींची ही क्रूर थट्टा थांबवावी अशी मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने मुक्ता दाभोलकर,अण्णा कडलास्कर, मिलिंद देशमुख, राहुल थोरात, प्रशांत पोतदार, नंदिनी जाधव यांनी केली आहे.

गलिच्छ पद्धतीचं राजकारण, राम कदमांना प्रवक्ता करताना भाजपला लाज वाटली नाही का? | सुषमा अंधारे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here