वाराणसीचं ज्ञानवापी मशीद, अयोध्या राम जन्मभूमी मंदिर, मथुरा शाही इदगाह, जम्मु कटरा येथील वैष्णोदेवी मंदिर, दिल्लीमधील स्वामीनारायण, अक्षरधाम मंदिर हे कदाचित टार्गेट होऊ शकतात, अशी परिस्थिती आहे. भारतीय जनता पक्ष-आरएसएसची धार्मिक ध्रुवीकरण करायची वृत्ती आहे. त्या वृत्तीला वाव मिळू नये, म्हणून वंचित बहुजन आघाडी ही मागणी करतेय. निवडणुका होईपर्यंत ही सगळी मंदिरं सैन्याच्या ताब्यामध्ये देण्यात यावीत. निवडणुकीनंतर मग त्या-त्या पोलीस स्टेशनच्या ताब्यामध्ये ती जातील. निवडणूक हे धार्मिक स्वरूपाचं होऊ नये हाच आमचा हेतू आहे, असं आंबेडकर म्हणाले.
दंगल घडवण्याचा दहशत माजवण्याचा प्रयत्न :
गेल्या नऊ वर्षामधलं राजकारण बघता एखाद्या समाजावर अत्याचार करायचा. त्याच्यातून दहशत निर्माण होईल असा प्रयत्न करायचा, अशी परिस्थिती आहे. मध्यंतरीच्या कालावधीमध्ये औरंगजेबाच्या नावाचा वाद काढण्याच्या प्रयत्न झाला. वंचित बहुजन आघाडीच्या भूमिकेमुळं तो वाद थांबला. आता मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद लावण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं दिसतंय. म्हणजे देशामध्ये अशांतता कशी राहील, याचा प्रयत्न सुरू असतो. लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका जवळ आलेल्या आहेत. अशा या परिस्थितीमध्ये वंचित बहुजन आघाडीकडे आलेल्या माहितीवरून हिंदू धर्मियांच्या जिव्हाळ्याच्या मंदिरांवर हल्ला केला जाणार आहे, असं आंबेडकर म्हणाले.
महत्त्वाचे विधेयक नाही
लोकसभेचं विशेष अधिवेशन ज्यावेळेस जाहीर झालं, त्यावेळेस वंचित बहुजन आघाडीच्यावतीनं आम्ही भूमिका मांडलीय की, हे फोटोसेशन आहे. जो काही अजेंडा काल बाहेर आलाय, त्यावरून असं दिसतंय की, कुठलीही सिरियस विधेयकं नाहीत. राज्यसभेनं मंजूर केलेलं बिल लोकसभेमध्ये मंजूर करायचं, हा एवढाच फक्त अजेंडा आहे. त्यामुळे २००० च्या नोटबंदीचा दुसऱ्यांदा निर्णय झाला, तर निवडणुका नोव्हेंबरमध्ये होऊ शकतात, अशी भूमिका वंचित बहुजन आघाडीनं घेतलीय. या दोन्ही भूमिका आपल्याला २५ तारखेपर्यंत स्पष्टपणे समजतील, असा दावा वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केलाय.
पाच मंदिरं निवडणूक होईपर्यंत सैन्याच्या ताब्यात द्यावी, इंडिया आघाडीनेही ही मागणी करावी
इंडिया नावाचं विरोधी पक्ष म्हणून उभं राहिलेलं आहे. ही पाच मंदिरं इलेक्शन होईपर्यंत सैन्याच्या ताब्यात द्यावी, ही भूमिका इंडिया आघाडीने सुद्धा घ्यावी. तसा त्यांच्याकडे आग्रह धरत आहोत, या संदर्भात लवकरच आम्ही त्यांच्याशी पत्र व्यवहारही करणार आहोत, असं आंबेडकर म्हणाले. तर या हल्ल्याची माहिती शासनाच्या गुप्तहेर खात्यांकडे सुद्धा आलेली आहे. म्हणून ही दक्षता घेतली पाहिजे, यासाठी वंचित बहुजन आघाडी ही भूमिका घेत आहे, असंही त्यांनी यावेळी सांगितलंय.