अहमदनगर : महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत ज्यांच्यासंबंधी विषयावर चर्चा होणार आहे, ते सभेच्या ठिकाणी येऊन प्रेक्षक गॅलरीत बसून चर्चा ऐकतात. प्रसंगी घोषणाबाजीही करतात, असा अनुभव अहमदनगर महापालिकेत नेहमी येतो. आजच्या सभेच्यावेळी मात्र थोडे वेगळे चित्र पहायला मिळाले. शहरातील तृतीयपंथीयांच्या विषयावर चर्चा होणार असल्याने तेही सभेत आले मात्र प्रेक्षक गॅलरीत न जाता थेट नगरसेवकांच्या खुर्च्यांवर जाऊन बसले. त्यांना तेथून उठविण्यासाठी मोठे प्रयत्न करावे लागले. या गोंधळात सभेचे कामकाजही ठप्प झाले होते.

अहमदनगर शहरात तृतीयपंथीयांची संख्या मोठी आहे. मात्र, त्यांच्यासाठी स्मशानभूमीच नाही. त्यामुळे अनेक वर्षांपासून स्मशानभूमीसाठी जागा मिळावी यासाठी तृतीयपंथीयांची संघटना प्रयत्न करत आहे. महानगरपालिकेकडेही अनेक वेळा त्यांनी अर्ज देऊन जागा मिळावी यासाठी प्रयत्न केले आहेत.

दुष्काळग्रस्त भागासाठी कॅबिनेट बैठक आहे की मंत्र्यांचे पर्यटन? विरोधी पक्षनेते वडेट्टीवार भडकले
आज झालेल्या महापालिकेच्या महासभेत तृतीयपंथीयांच्या स्मशानभूमीसाठी जागा देण्याचा विषय होता. त्यामुळे अनेक तृतीयपंथीय महापालिकेत आले होते. काही जण सभा सुरू होण्यापूर्वीच महासभेत आले आणि खुर्च्यांवर बसले. त्यामुळे काही नगरसेवकांशी त्यांचे वाद झाले. त्यामुळे प्रेक्षक गॅलरीत बसण्याची त्यांना विनंती केली गेली. मात्र, प्रेक्षक गॅलरीत जायलाच जागा नाही, सर्वत्र अस्वच्छता असल्याचे त्यांचे म्हणणे होते. ते ऐकल्यावर नगरसेवक संतप्त झाले. यासाठी प्रशासनाला दोषी धरण्यात आले. गोंधळामुळे काहीकाळ सभा थांबली. कर्मचारी व प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे नगरसेवकांना ऐकून घ्यावे लागते, अशा शब्दांत नगरसेवकांनी संताप व्यक्त केला.

निवडणूक आयोगात दादा vs साहेब, पुण्यातही झलक, अजित पवारांची बैठकीला दांडी, शरद पवारांसमोर जाणं टाळलं!
भटक्या कुत्र्यांची नसबंदी केली तरीही…

याच सभेत आणखी एक विषय गाजला. मोकाट कुत्र्यांच्या विषयावरून मनपाच्या महासभेत गोंधळ झाला. मोकाट कुत्र्यांच्या संख्येला आळा घालण्यासाठी त्यांना पकडून त्यांची नसबंदी केल्याचे सांगितले जाते, पण हा दावा तो फोल ठरल्याचे नगरसेवकांचे म्हणणे आहे. नसबंदी केलेल्या कुत्र्यांनाही पिल्ले होतात व शहरात मोकाट कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे, असा दावा नगरसेवकांचा आहे व त्याचे फलकही शुक्रवारच्या महासभेत झळकले.

मंत्रिमंडळ बैठक संभाजीनगरात, करोडोंचा खर्च, ३०० गाड्यांचा ताफा, ४०० अधिकारी दिमतीला, जयंत पाटलांची सडकून टीका
आयुक्तही गैरहजर असल्याने नगरसेवकांनी संताप व्यक्त करत व महासभा तहकुबीची मागणी केली. त्यामुळे अवघ्या पाऊण तासाच्या कामकाजानंतर सभा तहकूब झाली व ही सभा आता येत्या २२ सप्टेंबरला होणार असल्याचे महापौर रोहिणी शेंडगे यांनी जाहीर केले.

पोलीस तुम्हाला न विचारता लाठीचार्ज करतात, तर तुम्ही करताय काय ?; जयंत पाटलांचा सवाल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here