म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: मांजर, ‌श्वान आदी पाळीव वा भटक्या प्राण्यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्यासाठी अंत्यविधीची सुविधा मालाडमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे. नैसर्गिक वायू आधारित दहनाची अशी सुविधा देणारे मुंबई हे देशातील पहिले शहर ठरल्याची माहिती महापालिकेने शुक्रवारी दिली. शास्त्रोक्त व पर्यावरणपूरक पद्धतीने अंत्यविधीची ही सेवा विनामूल्य आहे.

महापालिकेचे पशुवैद्यकीय आरोग्य खाते आणि पी उत्तर विभाग कार्यालय यांच्या संयुक्त प्रयत्नातून मालाड पश्चिममध्ये कोंडवाडा (एव्हरशाइननगर) य़ेथे पाळीव लहान प्राण्यांच्या अंत्यसंस्कारासाठी दहनसुविधा करण्यात आली आहे. खासदार गोपाळ शेट्टी यांच्या उपस्थितीत शुक्रवारी ती खुली करण्यात आली. ५० किलो क्षमतेचा पीएनजीवर आधारित देशातील हा पहिलाच प्रयोग आहे. अनेक वर्षांपासून प्राणीमित्रांकडून मृत प्राण्यांचे शास्त्रोक्त दहन सुविधेसाठी मागणी होत होती, त्याची पूर्तता या माध्यमातून झाली आहे. या दहनव्यवस्थेसाठी इंधन स्वरूपात वायूपुरवठ्याची सुविधा महानगर गॅस लिमिटेडकडून दिली जाणार आहे.

गायीचं शाही डोहाळ जेवण; खास पंचपक्वान पदार्थांची मेजवानी अन् अख्ख्या गावाला आमंत्रण

तसेच, लवकरच याठिकाणी लहान पाळीव प्राण्यांचे शवागार (मॉर्च्युरी) सुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ही सुविधा मालाडमध्ये असली तरी तिचा उपयोग पश्चिम उपनगरासह संपूर्ण मुंबईतील पाळीव प्राण्यांच्या अंत्यविधीसाठी करता येईल. सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत ही सुविधा विनामूल्य मिळणार असल्याचे पी उत्तर विभागाचे सहायाक आयुक्त किरण दिघावकर यांनी सांगितले.

या दहनव्यवस्थेच्या संपर्कासाठी ८८७३८-८७३६४वर संपर्क साधता येईल. प्राणी दहनासाठी पालिका किंवा खासगी नोंदणीकृत पशुवैद्यकीय अधिकाऱ्याचे मृत्यू प्रमाणपत्र आवश्यक आहे.

सोनसाखळी पाचशेच्या नोटेत गुंडाळून हाराला लावा; गुप्तदानाच्या बहाण्याने महिलेची लूट

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here