म.टा.प्रतिनिधी, पुणे : ऐन पावसाळ्यात पावसाने पाठ फिरवल्याने पश्चिम महाराष्ट्रातील १७४ गावांसह १,१०८ वाड्या-वस्त्यांमधील सुमारे साडेतीन लाख नागरिकांना पाणीटंचाई भासत आहे. त्यासाठी त्यांना पायपीट करण्याची वेळ येत असल्याने १९९ टँकरद्वारे त्यांची तहान भागविली जात आहे. त्यात पुणे जिल्ह्यात ५०, तर सातारा जिल्ह्यात सर्वाधिक ९७ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे.

पश्चिम महाराष्ट्रात मार्च महिन्यापासूनच पाणीटंचाई जाणवत आहे. त्या वेळेपासून टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात येत आहे. जून महिन्यापर्यंत पावसाने ओढ दिली होती. त्यानंतर २६ जूननंतर पावसाने हजेरी लावली. पावसाच्या दमदार हजेरीनंतर जुलैमध्ये पाण्याची समस्या कमी झाली. त्यामुळे जूनपर्यंत सुरू झालेल्या टँकरची संख्या कमी झाली होती. पुणे जिल्ह्यात त्या वेळी टँकरची संख्या २६पर्यंत खाली पोहोचली होती. जुलै महिन्याच्या अखेरीपासून ते संपूर्ण ऑगस्ट महिना कोरडा गेला आहे; शिवाय सप्टेंबरचा अर्धा महिना कोरडा गेला आहे. तुरकळ स्वरूपात पावसाने हजेरी लावली असली, तरी पश्चिम महाराष्ट्रातील धरणांमध्ये फारशी पाणीसाठ्याची वाढ झालेली दिसत नाही. उलट, पश्चिम महाराष्ट्रातील वाड्या-वस्त्यांमध्ये आता पाणीटंचाई जाणवत असल्याने टँकरची मागणी वाढल्याचे चित्र आहे.

Dhangar Reservation: गिरीश महाजनांची मध्यस्थी फेल, धनगर आरक्षणासाठी आंदोलन, उपोषणकर्त्याची प्रकृती खालावली
सातारा, सांगलीत पाणीटंचाई

पुणे विभागात पुणे, सातारा, सांगली, सोलापूर जिल्ह्यांत पाणीटंचाईची स्थिती आहे. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात नऊ, जुन्नरमध्ये दहा, पुरंदरमध्ये दहा, खेडमध्ये आठ, तर शिरूर तालुक्यात सर्वाधिक १३ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. पुणे जिल्ह्यातील भोर, वेल्हे, बारामती, दौंड, इंदापूर, मावळ, मुळशी, हवेली या तालुक्यात अद्याप एकही टँकर सुरू नाही. पुणे जिल्ह्यात सध्या ५० टँकरने पाणी ३८ गावांसह २८३ वाड्यावस्त्यांना पाणीपुरवठा सुरू आहे. या टँकरने एक लाख आठ हजार ४८३ नागरिकांना पाणीपुरवठा करण्यात येत असून, त्यांची तहान भागविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने २३ विहिरी, बोअरचे अधिग्रहण केले आहे. ५० टँकरमध्ये नऊ सरकारी, तर ४१ खासगी टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे, अशी माहिती विभागीय आयुक्तालयाने दिली.

कोल्हापूरमध्ये पाणीटंचाई नाही

एकमेव कोल्हापूर जिल्ह्यात सध्या राधानगरी धरण भरल्याने पाण्याची समस्या जाणवत नसल्याने जिल्ह्यात अद्याप एकही टँकर सुरू नसल्याचे विभागीय आयुक्तलयाने दिलेल्या माहितीतून स्पष्ट झाले आहे. पश्चिम महाराष्ट्रात सातारा जिल्ह्यात सर्वाधिक ९७ टँकरने एक लाख ३७ हजार ८०८ नागरिकांची तहान भागविली जात आहे. साताऱ्यात ९१ गावे आणि ४३७ वाड्या-वस्त्यांना पाणीपुरवठा होत आहे. सांगली जिल्ह्यात ३७ टँकरने ३१ गावांसह २६७ वाड्यावस्त्यांना पाणी पुरवठा सुरू आहे. तर सोलापूर जिल्ह्यात १५ टँकरने १४ गावांसह १२१ वाड्या वस्त्यांना पाणी पुरवठा करण्यात येत आहे. पश्चिम महाराष्ट्रात १९९ टँकरने १७४ गावांसह १,१०८ वाड्यावस्त्यांना पाणीपुरवठा करून त्यांची तहान भागविली जात आहे. १९९ टँकर्समध्ये १७४ टँकर्स खासगी असून, २५ सरकारी टँकर्स आहेत, असेही विभागीय आयुक्तालयाने स्पष्ट केले.

पश्चिम महाराष्ट्रात पाणीपुरवठा करणाऱ्या टँकरची संख्या

१९९

पुणे विभागात पाणीपुरवठा करणारे सरकारी टँकर

५०

पुणे विभागात पाणीपुरवठा करणारे खासगी टँकर

४१

जिल्हे टँकरची संख्या

सातारा ९७

सांगली ३७

सोलापूर १५

क्रिकेटप्रेमींसाठी कोलंबोमधून आनंदाची बातमी, फायनलपूर्वी कसं आहे हवामान; पाहा VIDEO

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here