पिंपरी: लोकनेते यशवंतराव चव्हाणांमुळे पिंपरी-चिंचवड शहरात ‘एमआयडीसी’ निर्माण झाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यामुळे शहरात ‘आयटी पार्क’ आले, तेव्हापासूनच खऱ्या अर्थाने पिंपरी-चिंचवड शहराच्या विकासाला चालना मिळाल्याचे सांगून शरद पवार यांच्यामुळेच शहराचा विकास झाल्याचे आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत ठणकावून सांगितले. शहरासाठी शरद पवारांनी काय केले, किती निधी आणला, किती नेते मोठे केले हेही त्यांनी स्पष्ट केले. मात्र, हे सांगत असताना रोहित पवारांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा नामोल्लेख करणेही टाळले. त्यामुळे आता शहराचा विकास शरद पवारांनी केला, की अजित पवारांनी हा वाद पेटणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
पवार घराण्यावर तोंडसुख घेणं पडळकरांना महागात पडलं, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी डुकराची पिल्लं आणून…
राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) शहराध्यक्षपदी तुषार कामठे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत पवार बोलत होते. शहराध्यक्ष तुषार कामठे, प्रदेश युवक कार्याध्यक्ष रविकांत वरपे, माजी नगरसेविका सुलक्षणा शिलवंत, गणेश भोंडवे, युवक शहराध्यक्ष इम्रान शेख, महिला अध्यक्ष ज्योती निंबाळकर, देवेंद्र तायडे, काशिनाथ नखाते, माधव पाटील आदी उपस्थित होते. रोहित पवार म्हणाले, ‘शरद पवार केंद्रात मंत्री असताना शहरातील विकासासाठी ‘जेएनएनआरयूएम’ अंतर्गत तीन हजार कोटींपेक्षा जास्त निधी दूरदृष्टी ठेवून दिला आहे. त्यामुळेच शहरात प्रशस्त रस्ते, पूल झाले. मात्र, गेल्या पाच वर्षांत भाजपची सत्ता असताना कोणती मोठी विकासकामे झाली आहेत. ७० टक्के कामे गुजरातच्या कंपनीला दिल्याचे दिसते. कोणत्याही कंपनीला काम द्या; पण कामे पूर्ण झाली पाहिजेत. तसे होताना दिसत नाही.’

पोलिसाचं बासरीवादन, राज ठाकरेंच्या निवासस्थानी गणरायाचं आगमन

‘पिंपरी-चिंचवडमध्ये पूर्वी एका नेत्याच्या पाठीमागे चार-पाच लोक असायचे, हेच कोणाला नगरसेवक करायचे ते ठरवायचे. त्यांच्यामुळे शहरात पक्ष वाढला नाही. त्यांच्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेसची महापालिकेतील सत्ता गेली. त्यामुळे ते तिकडे गेले हे बरे झाले,’ असे आमदार रोहित पवार म्हणाले. शिवसेना फोडणाऱ्यांना सर्वांनी गद्दार म्हणून संबोधले. मग राष्ट्रवादी कॉँग्रेस फोडणाऱ्या अजित पवारांना तुम्ही ‘गद्दार’ का म्हणत नाही, असा प्रश्न विचारला असता, ‘आपण इतरांबद्दल का बोलायचे? विकास, बेरोजगारी, जनतेसमोरील प्रश्न यांवर सध्या काम सुरू आहे. आम्ही हे सर्व सोडून फक्त आपापसांत भांडावे, हे तर भाजपला हवे आहे; म्हणून असे काही न करता वैचारिक पद्धतीने लढा देत आहोत,’ असे रोहित पवारांनी सांगितले.

म. टा. प्रतिनिधी यांच्याविषयी

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here