वृत्तसंस्था, लाहोर : माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी पाकिस्तानच्या सद्यस्थितीबाबत घरचा आहेर देताना भारताची तोंडभरून स्तुती केली आहे. ‘आज भारत चंद्रावर गेला असून, नुकत्याच पाक पडलेल्या जी २० परिषदेचे यजमानपदही त्यांनी भूषवले. भारताची अर्थव्यवस्था मजबूत असून, त्यांची परकीय चलनाची गंगाजळी ६०० अब्ज डॉलरवर गेली आहे. या उलट पाकिस्तानची अवस्था भिकाऱ्यासारखी झाली असून, एक अब्ज डॉलरसाठी चीन आणि आखाती देशांपुढे हातपाय पसरण्याची वेळ आली आहे. या भीषण परिस्थितीमुळे पाकिस्तानच्या अब्रूची लक्तरे निघाली असून, देश दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे,’ या शब्दांत शरीफ यांनी पाकिस्तानच्या स्थितीवर भाष्य केले आहे.

‘आयएसआय’वर फोडले खापर

‘पाकिस्तानची अशी अवस्था करणारे सर्वांत मोठे गुन्हेगार असून, पाकिस्तान डेमोक्रेटिक मूव्हमेंटच्या सरकारने देशाला दिवाळखोरीपासून वाचवले; अन्यथा पेट्रोलचे प्रतिलिटर दर हजार रुपयांवर गेले असते. पाकिस्तानच्या या स्थितीला प्रामुख्याने माजी लष्करप्रमुख जनरल कमर बाजवा, ‘आयएसआय’चे माजी प्रमुख फैझ हमीद आणि माजी सरन्यायाधीश मियाँ साकिब निसार ही मंडळी जबाबदार आहेत,’ असेही शरीफ यांनी नमूद केले.
Pune News : गणेशोत्सवात पुण्यात येणाऱ्यांसाठी खूशखबर: पार्किंगसाठी २६ ठिकाणी वाहनतळ, वाचा संपूर्ण यादी

पाकिस्तानची जनता उपाशी

‘पाकिस्तानची जनता अन्नपाण्यासाठी झगडत आहे. काही विशिष्ट मंडळींनी देशाची अवस्था इतकी बिकट केली आहे. २०१७मध्ये अशी अवस्था नव्हती. तेव्हा तेल, साखर आणि गव्हाच्या पीठाचे भाव आवाक्यात होते. विजेचे बिलही आवाक्यात होते. आता किरकोळ वापराचे वीजबिलही ३० हजारांच्या घरात येते. बिल भरण्याचीही जनतेची ऐपत राहिली नसून, दोन वेळच्या जेवणाचीही भ्रांत आहे,’ या शब्दांत शरीफ यांनी पाकिस्तानच्या सद्यस्थितीवर बोट ठेवले.

माझ्या पंतप्रधानपदाच्या कारकिर्दीत पाकिस्तान प्रगती करीत होता. ते न बघवल्यामुळे कोर्टाने मला २७ वर्षांची शिक्षा सुनावली. त्यामुळे माझ्यावर परागंदा होण्याची वेळ आली. या सर्व प्रकारामागे जनरल बाजवा आणि जनरल फैझ यांचा हात आहे.

– नवाझ शरीफ, माजी पंतप्रधान, पाकिस्तान

वर्ल्ड कपमध्ये दिसणार रजनीकांत, जय शाह यांनी दिली खास गिफ्ट, पाहा काय आहे भेटीचं कारण….

भारताच्या अर्थनीतीचे कौतुक

साधारणत: नव्वदच्या दशकात भारताने अर्थव्यवस्था जगासाठी खुली केली. त्यांची अर्थवस्था आज ब्रिटनला मागे टाकून पाचव्या स्थानी पोहोचली आहे. अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना भारताकडे एक अब्ज डॉलरही नव्हते, मात्र आज त्यांच्या परकीय चलनाच्या गंगाजळीत ६०० अब्ज डॉलरचा निधी आहे,’ या शब्दांत शरीफ यांनी भारताचे कौतुक केले.
लोकसभा निवडणूक वेळेवर होणार पण महाराष्ट्रात मध्यावधी लागणार, विनायक राऊतांचा खळबळजनक दावा, म्हणाले..

मराठा आरक्षणासाठी आत्महत्या, पालकमंत्र्यांनी घेतली शिक्षण अन् लेकीला सासरी जाईपर्यंतची जबाबदारी!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here