बंगल्याच्या एकूण मालमत्तेपैकी ४० टक्के मालमत्तेचे नुकसान बीएमसीने केल्याचा कंगनाने दावा केला. यावर पुढच्या आठवड्यात मुंबई उच्च न्यायालय सुनावणी करणार आहे. आता जर कंगनाचं बांधकाम अनधिकृत नसल्याचं सिद्ध करू शकली नाही तर त्यांना कंगनाला म्हणून २ कोटी रुपये द्यावे लागतील.
मनालीहून कुल्लूला गेली कंगना
दरम्यान, सोमवारी कंगनाने
सोडली. आता मनालीत पोहोचल्यावर कंगनाला १० दिवसांसाठी क्वारन्टीन रहावं लागणार आहे. विशेष म्हणजे मुंबईहून मनालीला जाण्यापूर्वी ती परतत असल्याची माहिती मनाली इथल्या आरोग्य विभागाला देण्यात आली होती.
मुंबईहून कंगना थेट चंदीगढ विमानतळावर पोहोचली. तिथून ती प्रथम रस्तामार्गे कुल्लूला पोहोचली. इथे रंगोलीचं घर आहे. काही वेळ तिथे राहिल्यानंतर कंगना परत मनालीला आपल्या घरी आली. दरम्यान, हिमाचल प्रदेश सरकारने कंगनाला जी सुरक्षा पुरवली आहे, ती २४ तास सुरूच राहणार आहे. क्वारन्टीन असतानाही या सुविधेत खंड पडणार नाही.
जया बच्चन यांनी घेतली बॉलिवूडची बाजू
दरम्यान, जया बच्चन यांनी मंगळवारी राज्यसभेत बॉलिवूडला पाठिंबा दर्शवत स्पष्ट म्हटलं की, ‘सिनेसृष्टी रोज पाच लाख लोकांना थेट रोजगार देते. मनोरंजन क्षेत्रातील लोकांना सोशल मीडियाच्या माध्यमातून भडकावले जात आहे. याच इण्डस्ट्रीत नाव कमावलेल्या लोकांनी आता याला गटार म्हटलं आहे. मी या मताशी सहमत नाही. मला आशा आहे की सरकार अशा लोकांना अशा पद्धतीची भाषा न वापरण्याचा सल्ला देतील.’
जया बच्चन यांना कंगनाचं सडेतोड उत्तर
यावर कंगनानेही आपली प्रतिक्रिया दिली. ‘जया जी, माझ्या जागी तुमच्या मुलीला किशोरवयीन असताना मारहाण केली जाती, नशा करायला भाग पाडलं असतं आणि लैंगिक अत्याचार केले असते तर तेव्हाही तुम्ही हेच बोलला असता का? जर अभिषेकचा सतत छळ केला गेला असता आणि त्याला त्रास दिला गेला असता.. या सगळ्यानंतर एक दिवस जर त्याने आत्महत्या केली असती तर तेव्हाही तुम्ही हेच बोलला असता का? आमच्यावरही काही दया दाखवा.’ असं थेट मत कंगनाने व्यक्त केलं.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times