देहरादूनः अॅसिड हल्ल्यातील पीडित महिलांना दरमहा पेन्शन देण्याचा निर्णय उत्तराखंडमधील त्रिवेंद्र सिंह रावत सरकारने घेतला आहे. अॅसिड हल्ल्यातील पीडिता यांच्या सत्य घटनेवर आधारित चित्रपटापासून प्रेरणा घेत उत्तराखंड सरकारने हा निर्णय घेतला आहे.

राज्यातील अॅसिड हल्ल्यातील पीडितांना ७ हजार ते १० हजार रुपयांपर्यंत दरमहा पेन्शन देण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. अॅसिड हल्ल्यानंतर त्यातून सावरून आपले जीवन पुन्हा नव्याने सुरू करण्यासाठी प्रयत्न करत असलेल्या पीडितांना हे पेन्शन दिले जाणार आहे.

महिला व बाल विकास विभागाकडून अशा प्रकारचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. या प्रस्तावावरील मसुद्यावर काम सुरू आहे. हा प्रस्ताव लवकरच राज्य मंत्रिमंडळासमोर ठेवला जाईल, अशी माहिती महिला व बाल विकास मंत्री यांनी दिली. उत्तराखंड सरकारने घेतलेल्या या निर्णयाचे स्वागत करत, चित्रपट निर्मितीमागे हाच उद्देश होता, असे ट्विट दिग्दर्शिका यांनी केले.

अॅसिड हल्ल्यातील पीडिता हरिद्वार, नैनीताल आणि उधमसिंह नगर या भागात मोठ्या प्रमाणावर राहतात. पेन्शन मिळाल्यामुळे पीडितांना आर्थिक आधार मिळून, त्या सन्मानाचे जीवन जगू शकतील. आपल्या आयुष्याची नवी सुरुवात करू शकतील, असेही आर्या यांनी सांगितले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here