म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

मकर संक्रांतीचा सण आला की, पतंगाच्या सिझनला सुरुवात होते. बालकांसह ज्येष्ठ मंडळी पंतग उडविण्याची मौज लुटतात. मात्र पतंग, पतंगाचा मांजा विद्युत खांब, रोहित्रे, विद्युत वाहिन्यांच्या संपर्कात आल्यामुळे अपघाताच्या घटना घडण्याची शक्यता असते. उडविताना विद्युत यंत्रणेपासून सावधानता बाळगावी, असे आवाहन महावितरणने केले आहे.

आपत्कालीन परिस्थितीमध्ये महावितरणच्या नजीकच्या शाखा कार्यालयाशी संपर्क साधावा. यामुळे वीजपुरवठा खंडीत करुन तातडीची मदत करणे सोयीचे होईल, असे महावितरणने म्हटले आहे. महावितरणच्या २४ तास कार्यरत असलेल्या ग्राहक सेवा केंद्राच्या १९१२ किंवा १८००२३३३४३५ या टोल क्रमांकावर संपर्क साधावा. १८००१०२३४३५ हा क्रमांकही उपलब्ध आहे.

जिल्ह्यात गेल्या दोन, अडीच महिन्यापूर्वी पतंग काढतानाच्या नादात जीव गमावल्याच्या दोन घटना घडल्या आहेत. कर्नाटकातून इचलकरंजी येथे आजोळी आलेल्या एका मुलालाही जीव गमवावा लागला आहे. नागरिकांनी व मुलांनी पतंग उडविताना खबरदारी घ्यावी. शहरी व ग्रामीण भागामध्ये विद्युत वितरणासाठी आवश्यक पायाभूत सुविधांचे जाळे पसरलेले आहे. विद्युत वाहिन्या व खांबावर अडकलेला पतंग काढण्याचा प्रयत्न करु नये. विद्युत वाहिन्यांचे एकमेकांवर घर्षण होवून शॉर्टसर्किट होवून जीवित व वित्तहानीची शक्यता असते.

पतंगप्रेमींनी काय खबरदारी घ्यावी….

मोकळ्या मैदानात पतंग उडवावा.

विद्युत वाहिन्या, खांबावर अडकलेला पतंग व मांजा काढण्याचा प्रयत्न टाळावा.

घराच्या गच्चीवरुन, रोहित्रांवर चढून विद्युत तारांमध्ये अडकलेला पतंग काढण्याचा प्रयत्न करू नये.

पतंग काढण्यासाठी दगडाला दोरा बांधून वाहिन्यांवर फेकणे चुकीचे आहे.

धातुमिश्रीत मांजाचा वापर टाळावा.

धातुमिश्रीत मांजा विद्युत यंत्रणेच्या संपर्कात आल्यास विजेचा धक्का लागण्याचा धोका असतो.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here