केंद्र सरकारनं आणलेल्या कृषी विषयक विधेयकांच्या संदर्भात ते नागपूरमध्ये बोलत होते. ही विधेयके ऐतिहासिक असून यामुळं शेतकरी आपला माल देशभरात कुठेही विकू शकतो, असं फडणवीस म्हणाले. कृषी विधेयकाला शिवसेनेनं राज्यसभेत विरोध केला. ‘ही विधेयके इतकी क्रांतिकारक आहेत तर यापुढं कुठलाही शेतकरी आत्महत्या करणार नाही याची हमी सरकार देणार का, असा सवाल शिवसेनेचे खासदार यांनी केला होता. त्याबाबत विचारलं असता फडणवीस यांनी शिवसेनेवर टीकेची झोड उठवली.
वाचा:
‘कृषी विधेयकांबाबत शिवसेनेनं लोकसभा आणि राज्यसभेत वेगळी भूमिका घेतली. यात नवल नाही. शिवसेनेला याची सवय आहे. आमच्या सोबत सरकारमध्ये असताना देखील ते एकाच वेळी सत्ताधारी व विरोधक अशा दोन भूमिकांमध्ये वावरत होते. कृषी विधेयकांवरही त्यांनी हेच केलंय. विधेयकाला विरोध करणाऱ्यांकडे गेल्यावर राज्यसभेत विरोध केला असं सांगायचं आणि समर्थन करणाऱ्यांकडे गेल्यावर लोकसभेत पाठिंबा दिल्याचं सांगायचं अशी त्यांची रणनीती आहे. खरंतर आधी शिवसेनेनं आपली भूमिका ठरवली पाहिजे. मात्र, शेतीसंदर्भात शिवसेनेनं कुठली भूमिकाच कधी मांडलेली नाही. आता राज्यात त्यांचं सरकार आहे. अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. संजय राऊत केंद्र सरकारला इतकं शिकवताहेत तर त्यांचं सरकार शेतकरी आत्महत्या करणार नाहीत याची हमी घेईल का?,’ असा प्रश्न फडणवीस यांनी केला. ‘हे सगळं निव्वळ राजकारण आहे,’ असा टोला फडणवीस यांनी राऊतांना हाणला.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times