नवी दिल्लीः भारत-चीन सैन्यात सोमवारी कॉर्प्स स्तरावर झालेल्या चर्चेनंतर आज मंगळवारी दोन्ही देशांनी एक संयुक्त निवेदन जारी केलं. कुठल्याही देशाने एकतर्फी कारवाई करू नये आणि दोन्ही देशांच्या नेत्यांनी केलेल्या महत्त्वपूर्ण सहमतीची अंमलबजावणी करण्यासह लवकरच दोन्ही देशात सातव्या फेरीची चर्चा करण्यावर सहमती झाली आहे.

पूर्व लडाखमध्ये दोन्ही देशांत गेल्या काही महिन्यांपासून तणावाचं वातावरण आहे. सीमेवर शांतता प्रस्थापित करण्यासाठी बैठकांच्या फेऱ्या सुरू आहेत. यानुसार भारत-चीन सैन्यात वरिष्ठ कमांडर्स स्तरावर सोमवारी सहाव्या फेरीच्या बैठक झाली. ही बैठक सुमारे १३ तास चाललील्या या संदर्भात चर्चा झाली.

या बैठकीनंतर दोन्ही देशांकडून एक संयुक्त निवेदन जारी करण्यात आलंय. भारत आणि चीनमधील वरिष्ठ कमांडरमध्ये सहाव्या फेरीची बैठक झाली. भारत-चीन सीमा भागात एलएसीवर परिस्थिती स्थिर करण्याबाबत दोन्ही बाजूंनी स्पष्ट आणि सखोल विचारांचं आदानप्रदान केलं, असं निवेदनात नमूद करण्यात आलं आहे.

गैरसमज टाळण्यावर सहमती

भारत-चीन सीमा भागातील एलएसीबरोबर परिस्थिती स्थिर करण्याबाबत दोन्ही बाजूंनी स्पष्ट आणि सखोल विचार-विनिमय केला. त्यांनी दोन्ही देशांच्या नेत्यांद्वारे महत्त्वपूर्ण सहमती लागू करण्याचे, जमिनी स्तरावर संवाद बळकट करण्यास, गैरसमज आणि गैरसमज करण्यापासून वाचण्यासह आणि आघाडीवरील ठिकाणांवर अधिक जवान पाठवणं रोखण्यास सहमती झाली आहे.

त्याच वेळी, दोन्ही देशांनी एकतर्फी जमिनीवरील स्थिती बदलण्यापासून दूर रहावं आणि स्थिती तणावपूर्ण बनेल असं कोणतंही पाऊल उचलण्यापासून दूर राहण्यावर सहमती झाली आहे.

लवकरात लवकर ७ व्या फेरीच्या सैन्य कमांडर-स्तरीय बैठक घेण्यास दोन्ही बाजूंनी सहमती दर्शवलीय. प्रत्यक्ष सीमेवरील समस्यांचे योग्य निराकरण करण्यासाठी आणि सीमाभागात संयुक्तपणे शांतता आणि सौहार्द राखण्यासाठी व्यावहारिक उपाययोजना करण्यावर सहमती दर्शवली गेली.

दरम्यान, चीनच्या राष्ट्रीय संरक्षण मंत्रालयाच्या प्रवक्त्याने या बैठकीसंदर्भात माहिती दिलीय. चीन आणि भारतमध्ये सीमेवर आघाडीच्या ठिकाणांवर अधिक सैन्य न पाठवण्यावर सहमती झाली आहे. त्याचबरोबर सीमेवर एकतर्फी कारवाई टाळण्यासाठी आणि परिस्थिती बिकट होईल अशी कोणतीही कारवाई करण्यापासून दूर राहण्यास तयारी दर्शवली आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here