ऑक्सिजन पुरवठ्याचे नियमन करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. या सामितीच्या बैठकीत उद्योजकांनी आपली भूमिका मांडली. लॉकडाऊनच्या काळात लघु व मध्यम स्वरूपाच्या कारखान्यांनी कोणत्याही प्रकारची कामगार कपात न करता त्यांना बेरोजगार होऊ दिले नाही. आता देश अनलॉककडे वाटचाल करीत असून, त्यामुळे परिस्थिती पूर्वपदावर येण्यास मदत होत आहे. औद्योगिक क्षेत्रालादेखील नवसंजीवनी मिळावी, म्हणून केंद्राने व राज्याने मार्गदर्शक सूचना जारी केल्या असून, त्यांचे काटेकोर पालन करीत कारखानदार पूर्वपदावर येत आहेत. असे असताना उद्योजकांसमोर ऑक्सिजनचे नवीन संकट उभे ठाकले आहे.
कारखानदारांना मटेरियल व लेझर कटिंग आणि इतर अनेक गोष्टींसाठी ऑक्सिजन लागते. परंतु आरोग्य क्षेत्रात ऑक्सिजनची मागणी वाढली असून, ऑक्सिजन अत्यावश्यक गरज झाली आहे. याच्याशी आमी संघटना सहमत आहे व पूर्ण सहकार्य करीत आहे. परंतु केंद्राच्या नियमानुसार आरोग्यासाठी ८० टकके व औद्योगिकसाठी २० टक्के ऑक्सिजन पुरवठा करावा, असे ऑक्सिजन उत्पादकांना सरकारने कळविले आहे. पुरवठ्यात त्रुटी असतीस तर त्या दूर करून आम्हा कारखानदारांना गरजेचा असणारा ऑक्सिजन सिलेंडर वैद्यकीय क्षेत्राला कमी न पडू देता उपलब्ध करून द्यावा व कारखानदारांना न्याय द्यावा. जेणेकरून पूर्वपदावर येत असलेली औद्यागिक वसाहत सुरळीत चालेल, अन्यथा ऑक्सिजनअभावी उद्योजकांना कारखाने बंद ठेवावे लागतील. परिणामी त्यावर मोठ्या संख्येने अवलंबून असणारे कामगार बेरोजगार होतील, असे निवेदनात म्हटले आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times