मुंबई: हे आजवरचे सर्वात निष्क्रीय मुख्यमंत्री आहेत. ते मातोश्री निवासस्थानाच्या बाहेर पडत नाहीत, असे एकना अनेक आरोप भाजपचे राज्यातील नेते करत असताना राज्यात करोनाकाळातही या महासंकटाशी लढा देत विकासाची कामे कशी सुरू होती, याचा लेखाजोखाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान यांच्यापुढे मांडला आहे. ( PM – CM Meeting updates )

वाचा:

संसर्गाचा सर्वाधिक प्रादुर्भाव असलेल्या सात राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला. यावेळी महाराष्ट्रातील स्थितीची सर्वंकष माहिती मुख्यमंत्री ठाकरे यांनी पंतप्रधानांपुढे ठेवली. करोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकारने सुरू केलेल्या ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेला कशाप्रकारे प्रतिसाद मिळत आहे, हे सांगतानाच गेल्या सात महिन्यांत सरकारने आरोग्य क्षेत्रात जे भरीव काम केले आहे, त्याचा तपशील मुख्यमंत्र्यांनी सादर केला. सरकारने अर्थचक्राला गती देण्यासाठी त्वरेने घेतलेल्या निर्णयांची माहितीही ठाकरेंनी दिली. या माहितीचा तपशील पुढीलप्रमाणे…

माझे कुटुंब, माझी जबाबदारी :

– राज्यात ५५ हजार आरोग्य पथके तयार करण्याचे निश्चित केले होते. मात्र त्यापेक्षा जास्त म्हणजे ५९ हजार पथके तैनात.
– मोहीम सुरू झाल्यापासून राज्यात ७० लाख ७५ हजार ७८२ घरांना (२६% घरे) भेटी दिल्या. त्यात २.८३ लाख ६३ हजार लोकांचे आरोग्य सर्व्हेक्षण झाले.
– मोहिमेत ४८२४ कोविड पॉझिटिव्ह व्यक्ती तसेच ७ लाख ५४ हजार व्याधींनी ग्रस्त लोक आढळले.

करोना काळात राज्य सरकारने घेतलेले निर्णय:

– राज्यातील सर्वच नागरिकांना महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ
– खासगी रुग्णालयात ८० टक्के बेड्स राखीव ठेवणे बंधनकारक केले
– करोनाच्या अनुषंगाने करावयाच्या चाचण्यांचे दर नियंत्रित केले.
– तज्ञ डॉक्टर्सचा राज्यस्तरीय टास्क फोर्स तयार केला. प्रत्येक जिल्ह्यातही डॉक्टर्सचे टास्क फोर्स स्थापन केले.
– गावोगावी करोना ग्राम दक्षता समित्या नेमल्या.
– ऑक्सिजनच्या उत्पादनावर नियंत्रण. आता एकूण ऑक्सिजन उत्पादनाच्या ८० टक्के पुरवठा मेडिकलसाठी व २० टक्के पुरवठा उद्योगांसाठी करणे कायद्याने बंधनकारक.
– ऑक्सिजन वाहून नेणाऱ्या टँकरना रुग्णवाहिकेचा दर्जा दिला.
– ऑक्सिजन उपलब्धतेसाठी व येणाऱ्या अडचणींसाठी नियंत्रण कक्ष
– गेल्या महिन्यात राज्यात १८ RTPCR चाचणी प्रयोगशाळा सुरू झाल्या. सध्या राज्याची चाचणी क्षमता (प्रतिदिन) ८० हजार इतकी आहे.
– लक्षणे दिसणाऱ्या रुग्णांच्या घशातून दोन द्राव्य घेतले जातात. Rapid Antigen Test निगेटिव्ह आली तर दुसरा घेतलेला द्राव्य RTPCR चाचणीसाठी पाठविला जातो.
– RTPCR चाचणी कीट अतिशय स्पर्धात्मक किंमतीत खरेदीस सुरुवात

बेड्स उपलब्धता

– मार्च २०२० मध्ये ७७२२ बेडस, आयसीयु बेडस ३०९१ आणि ११४३ व्हेंटीलेटर्स होते आज एकूण उपलब्ध बेडची संख्या ३.६० लाख एवढी आहे.
– राज्यात क्वारंटाइनसाठी ३५३ संस्थांमध्ये १६,१९२ खाटांची सोय होती. सध्या १०१० संस्थात्मक क्वारंटाइन सुविधांमध्ये १,२४,२८४ खाटा उपलब्ध आहेत.

वाचा:

राज्याचे अर्थचक्र वेगाने सुरू

– प्रक्रियेनंतर राज्यात ९५ टक्के उद्योग पुन्हा सुरू झाले आहेत. अर्थचक्राला गती मिळाली आहे.
– सुमारे ६ हजार जणांना महाजॉब्सद्वारे नोकरी देण्यात आली आहे.
– विकेल तेच पिकेल या धोरणाचा शेतकऱ्यांना लाभ. शेतमालाला हमखास भाव मिळण्यासाठी हे अभियान उपयुक्त ठरेल आणि त्यातून शेतकरी चिंतामुक्त होईल.
– १९,४५० कोटीची कर्जमुक्ती. ३१.८९ लाख शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांत रु १९ हजार ४५० कोटी जमा.
– सर्वसामान्यांना घरासाठी पाऊले: ८ महानगरपालिका आणि ७ नगरपालिकांसाठी स्वतंत्र झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण स्थापन करण्याचा निर्णय.
– ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचे काम वेगाने सुरु करण्यात आले आहे. महामार्गावर उभारण्यात येणाऱ्या २४ टाऊनशिपची योजना तयार होत आहे.
– गेल्या काही वर्षांपासून बंद असलेली खावटी योजना सुरु करण्यात आली असून १०० टक्के अनुदान म्हणून २००० रुपये रोख रक्कम आणि २००० रुपयांच्या जीवनावश्यक वस्तू देत आहोत.
– आदिवासी मुले आणि महिलांना अतिरिक्त दुधापासून तयार झालेली भुकटी ६ लाख ५१ हजार मुलांना तसेच १ लाख २१ हजार गरोदर, स्तनदा मातांना १ वर्षाकरीता मोफत देणे सुरू .
– रोहयोची कामे वेगाने सुरू करण्यात आली आहेत.
– महिला आर्थिक विकास महामंडळाने (माविम) ग्रामीण भागातील महिला स्वयंसहायता बचतगटाच्या शेतकरी महिलांनी उत्पादित शेतमालाला चांगला बाजारभाव मिळण्याच्या हेतूने ‘ई-बिझनेस प्लॅटफॉर्म’ सुरु केला आहे.

वाचा:

शाळा बंद पण शिक्षण सुरू

– गुगल क्लास रुम/ तसेच टाटा स्काय, जिओ, दिशा एप या माध्यमांवरही विद्यार्थ्यांना शिकवले जात आहे.
– राज्यातील परिक्षा प्रक्रिया ३१ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन.

पर्यटनाला चालना:

– ईज ऑफ डुईंग बिझनेसअंतर्गत हॉटेल व्यवसायासाठी परवानग्यांची संख्या कमीतकमी करण्याचा प्रयत्न आहे. / साहसी पर्यटन
– संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाजवळची आरेची ६०० एकर जागा वनासाठी राखीव. एखाद्या महानगराच्या मध्यभागी अशा रीतीने विस्तीर्ण जंगल फुलविण्याचे संपूर्ण जगातील हे पहिलेच उदाहरण ठरणार आहे.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here