झुंझनू: राजस्थानच्या जिल्ह्यातील नगर परिसरात बुधवारी तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या मुलीचा मृतदेह एका विहिरीत सापडला. या घटनेची माहिती मिळताच गावातीलच एका तरुणाने विहिरीत उडी मारून केली. श्लोलपुरा गावात ही घटना घडली. दोघेही सरकारी शाळेत १२ वीच्या एकाच वर्गात शिकत होते. बेपत्ता असलेल्या अल्पवयीन मुलीविषयी तिच्या घरच्यांनी त्याला घरी बोलावून विचारणा केली होती.

झुंझनूचे डीएसपी विजय कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात येत असतानाच, गावातीलच एका तरुणाने दुसऱ्या विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. दोघेही एकाच वर्गात शिकत होते. दोघांमध्ये प्रेमसंबंध होते का, या दिशेनेही चौकशी केली जात आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, या गावातील सुनीता देवी यांनी आदल्या दिवशीच त्यांच्या अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याची तक्रार पोलीस ठाण्यात केली होती. अनोळखी तरुणाविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला होता. मात्र, कोणताही पुरावा हाती लागला नव्हता. बुधवारी सकाळी गावातील एका विहिरीत मुलीचा मृतदेह आढळला. याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले.

मुलीचा मृतदेह ग्रामस्थांच्या मदतीने विहिरीतून काढण्यात येत होता. त्याचवेळी गावातीलच १८ वर्षीय मनीष याने दुसऱ्या विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. तो आणि मुलगी एकाच वर्गात शिकत होते. या घटनेची माहिती मिळताच, पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने विहिरीतून युवकाचा मृतदेह बाहेर काढला.

आणखी बातम्या वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here