आपल्या फेसबुकवर राज ठाकरे यांनी याबाबत लिहिलं आहे. ‘आणि… डॉ. काशिनाथ घाणेकर २०१८ साली रिलीज झाला होता, पण माझा पाहायचा राहून गेला होता. सध्या बाहेर प्रचंड पाऊस असल्यामुळं बाहेर पडणं शक्य नाही. त्यामुळं नेटफ्लिक्सवर मराठी सिनेमे बघताना हा सिनेमा समोर आला आणि एका बैठकीत तो बघून संपवला,’ असं राज यांनी म्हटलं आहे.
वाचा:
चित्रपटाबद्दल बोलताना आपल्या पोस्टमध्ये ते म्हणतात, ‘एका शब्दात सांगायचं तर अप्रतिम सिनेमा आहे. कमालीची उत्तम बांधलेली स्क्रीप्ट, स्क्रीनप्ले आणि उत्तम दिग्दर्शन. भालजी पेंढारकर सोडले तर डॉ. काशिनाथ घाणेकर, वसंत कानेटकर ते प्रभाकर पणशीकरांपर्यंत प्रत्येकाला भेटण्याचा मला योग आला होता आणि व्यंगचित्रकार असल्यामुळं प्रत्येकाच्या लकबी मी तेव्हा हेरल्या होत्या. आज सिनेमात प्रत्येकाचं काम पाहताना जाणवलं की सगळ्यांनी ही सगळी पात्रं काय जबरदस्त उभी केली आहेत. सुबोध भावे, सुमित राघवन, सोनाली कुलकर्णी, आनंद इंगळे, प्रसाद ओक, मोहन जोशी, नंदिता धुरी, वैदेही परशुरामी खरंच सगळ्यांचे अभिनय कडक आहेत.’
सिनेमात दाखवलेला काळ मराठी रंगभूमीचा सुवर्णकाळ होता. करोनोत्तर काळात मराठी रंगभूमी पुन्हा अशीच बहरू दे… नटांच्या, संहितांच्या जोरावर तसंच, नाट्यवेड्या मराठी माणसाच्या प्रतिसादावर पुन्हा नाट्यगृहाच्या बाहेर हाऊसफुल्लचे फलक कायमचे लागू देत,’ अशी इच्छाही त्यांनी या निमित्तानं व्यक्त केली आहे.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times