दुबई: IPLमध्ये गुरुवारी झालेल्या सामन्यानंतर गुणतक्त्यात मोठा फेरबदल झाला आहे. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूविरुद्धच्या सामन्यात किंग्ज इलेव्हन पंजाबने ९७ धावांनी विजय मिळवत गुणतक्त्यात अव्वल स्थान मिळवले. दोन सामन्यात त्याचे दोन गुण झाले असून त्यांचा रनरेट + २.४५ इतका आहे.

वाचा-
स्पर्धे आतापर्यंत पंजाब, बेंगळुरू, मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज या संघांचे प्रत्येकी दोन सामने झाले आहेत. या सर्व संघांनी एक सामन्यात विजय तर एक सामन्यात पराभव स्विकारला आहे. या सर्व संघांचे गुण दोन आहेत. त्याच बरोरब राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांनी देखील एक विजय मिळवत दोन गुण मिळवले आहेत.

वाचा-
सनरायजर्स हैदराबाद आणि कोलकाता नाइट रायडर्स यांनी पहिला सामना गमवल्यामुळे त्यांनी अजून गुणतक्त्यात खाते सुरू केले नाही.

वाचा-

वाचा-

काल मुंबईने कोलकातावर विजय मिळवत अव्वल स्थान मिळवले होते. पण आज पंजाबने ९७ धावांनी विजय मिळवत चांगले रनरेट मिळवले. गुणतक्त्यात पंजाबनंतर मुंबई संघ असून त्याचे रनरेट +०.९९३ इतके आहे. त्यानंतर राजस्थानचे रनरेट +०.८००, दिल्ली चौथ्या स्थानावर (रनरेट +०.०००) आहे. चेन्नई -०.१४५ रनरेटसह पाचव्या, बेंगळुरू -२.१७५ सह सहाव्या, हैदराबाद -०.५०० सह सातव्या तर कोलकाता -२.४५० सह आठव्या स्थानावर आहे.

हे देखील वाचा-

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here