अहमदनगर: ‘सत्तेत नसल्यामुळे विरोधकांची आगपाखड होत आहे. आमच्याशिवाय राज्यात कोणाला सत्ता जमणारच नाही, अशी त्यांची भूमिका तयार झाली होती. त्यांच्या या भूमिकेला तडे जाताना दिसत आहेत. त्यांच्या कल्पनेच्या पलीकडे जाऊन आम्ही सर्व मंडळी एकत्र आलो आणि राज्य सरकार चालवू लागलो. त्यामुळे विरोधकांचा संयम सुटत चालला अजून छोटी छोटी प्रकरणे फार मोठी भासवण्याचा प्रयत्न होतोय,’ अशी टीका मंत्री यांनी कंगना व सुशांतसिंह प्रकरणावर बोलताना राज्यातील भाजप नेत्यांवर केली. ते नगर मध्ये बोलत होते.

वाचा:

‘सुशांतसिंह प्रकरणाबाबतची चर्चा ही आता दुसरीकडे भरकटली आहे. या प्रकरणाचा मुंबई पोलिसांनी योग्य तपास करण्याचा प्रयत्न केला. नंतर हे प्रकरण सीबीआयकडे गेले आहे. मात्र या प्रकरणावरून दुर्दैवाने राजकारण होताना दिसते. मुळात सर्वांनी एकत्र येऊन करोना मुकाबला करण्यासाठी राज्य सरकारला सहकार्य करणे गरजेचे होते. पण तसं होत नाही व विरोधक लोकांचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करत आहेत,’ असा घणाघातही त्यांनी केला.

…म्हणून आज भारत बंद

कृषी विधेयकाला विरोध म्हणून आज भारत बंदची हाक शेतकरी संघटनांनी दिली आहे. याबाबत ही मंत्री गडाख यांनी भाष्य केले. ते म्हणाले, ‘कृषी विधयक बळजबरीने राज्यसभेत व लोकसभेत मंजूर करून केंद्र सरकारने घेतले. या विधेयकाची चर्चा झाली नाही. शेतकर्‍यांचे जे प्रश्न होते त्याचे उत्तर न देता बळजबरीने हे विधेयक केंद्र सरकारने मंजूर करून घेतले. आजचा भारत बंद हा त्यालाच विरोध दिसत आहे.’

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here