नवी दिल्ली : संयुक्त राष्ट्र महासभेला संबोधताना भारताचे यांनी जगाला एक मोठं दिलंय. हे आश्वासन देताना पंतप्रधान मोदींनी भारताच्या क्षमतेवर पूर्ण विश्वास व्यक्त केलाय. महामारीच्या या संकटातही भारताच्या फार्मा इंडस्ट्रीनं १५० हून अधिक देशांना गरजेची औषधं पुरविली आहेत. ‘जगातील सर्वात मोठा लस उत्पादक देश’ म्हणून मी आज जगाला एक आश्वासन देऊ इच्छितो. ‘भारताची लस निर्मिती आणि लस पुरवठा क्षमता संपूर्ण मानवतेला या संकटातून बाहेर काढण्यासाठी कामी येईल’ असा विश्वास मोदींनी यावेळी व्यक्त केलाय.

संबंधित बातम्या :

वाचा :

वाचा :

भारताचा मार्ग… जनकल्याण ते जगकल्याण!

जगातील सर्वात मोठी लोकशाही असल्याची प्रतिष्ठा आणि याचा अनुभव आम्ही विश्वहितासाठी वापरू. आमचा मार्ग जनकल्याण ते जगकल्याण असा आहे. भारत नेहमीच शांती, सुरक्षा आणि समृद्धीसाठी आवाज उचलत राहील. भारताचा आवाज मानवता, मानव आणि मानवीय मूल्यांचे शत्रू असलेल्या – दहशतवाद, अवैध हत्यारांची तस्करी, ड्रग्ज, मनी लॉन्डरिंग यांच्याविरुद्ध उठेल, असंही पंतप्रधान मोदींनी म्हटलं.

गेल्या चार – पाच वर्षांत ४०० दशलक्ष लोकांना बँकिंग सिस्टमशी जोडणं सोपं नव्हतं. परंतु, भारताना ही शक्य करून दाखवलं. आज भारतात गावांतील १५० दशलक्ष घरांत नळानं पाणी पोहचवण्याची मोहीम सुरू आहे. काही दिवसांपूर्वी भारतानं आपल्या सहा लाख गावांना ब्रॉडबँड ऑप्टिकल फायबरनं जोडण्याच्या एका मोठ्या योजनेची सुरूवात केलीय. करोना संकटानंतर भारत ‘आत्मनिर्भर भारता’ची भूमिका घेत पुढे वाटचाल करतोय. आत्मनिर्भर भारत मोहीम, जागतिक अर्थव्यवस्थेसाठी एक फोर्स मल्टिप्लायर सिद्ध होईल. सर्व योजनांचा लाभ कोणत्याही भेदभावाशिवाय प्रत्येक नागरिकापर्यंत पोहचेल, हे भारत सुनिश्चित करत आहे, असं आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक मंचावर दिलंय.

करोना महामारीला तोंड देताना आज सगळं विश्वच गेल्या आठ-नऊ महिन्यांपासून एका वेगळ्या अनुभवाला सामोरं जातंय. आज आपल्याला सर्वांनाच गंभीर आत्ममंथनाची गरज आहे, असं म्हणतानाच ‘या जागतिक संकटाशी लढा देण्याच्या प्रयत्नांत संयुक्त राष्ट्र कुठंय?’ असा प्रश्नही पंतप्रधान मोदींनी यावेळी विचारला.

वाचा :

वाचा :

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here