सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाच्या तपासातून बॉलिवूडमधील ड्रग्ज रॅकेट समोर आल्यानंतर सक्रिय झाला आहे. सध्या या प्रकरणात बॉलिवूडमधील मोठ्या कलाकारांची चौकशी सुरू आहे. एनसीबीच्या कार्यालयात होत असलेल्या चौकशीचे प्रत्येक अपडेट प्रसारमाध्यमांकडून दिले जात आहे. यावरून महाराष्ट्र काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाष्य केलं आहे.
‘मोदी सरकारची आर्थिक स्थिती अत्यंत डळमळीत आहे. जीएसटीचा परतावा राज्यांना देण्याचीही मोदी सरकारची ऐपत नाही. संपूर्ण अर्थव्यवस्था मोडीत निघाली आहे. याबाबत विचार केल्यास आयपीएलप्रणाणे सीबीआय, ईडी व एनसीबीच्या थेट प्रक्षेपणाचे हक्क विक्रीत काढावे त्यांचा लिलाव करावा. प्रचंड मोठ्या प्रमाणात पैसा निर्माण होऊ शकले,’ असा सल्ला सचिन सावंत यांनी दिला आहे आहे.
‘एनसीबीच्या चौकशीचे हक्क विक्रीस काढल्यात मोदी सरकारच्या आर्थिक गरजा थोड्याफार प्रमाणात पूर्ण करता येतील. दुसरीकडे भाजपचा जो राजकीय हेतू आहे, माध्यमातून लोकांची दिशाभूल करणे, लोकांना गुंतवून ठेवणे, बिहार निवडणूकीसाठी त्याचा उपयोग करणे, याच्यासाठी त्याची मदत होईल. भाजपचे आर्थिक आणि राजकीय हे दोन्ही हेतू साध्य होतील,’ असंही ते म्हणाले आहेत.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times