वाचा:
राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एनडीए स्थापन झाल्यापासून जे मोजके पक्ष भाजपसोबत होते त्यात शिवसेना आणि हे सर्वात प्रमुख पक्ष होते. १० महिन्यांपूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली. या राजकीय भूकंपातून महाविकास आघाडी अस्तित्वात आली. परस्परविरुद्ध विचारसरणी असलेले काँग्रेस-राष्ट्रवादी हे दोन पक्ष शिवसेनेसोबत आले. या भूंकपाचे धक्के दिल्लीपर्यंत जाणवले. शिवसेनेने भाजपची साथ सोडताना केंद्र सरकारमधून बाहेर पडत एनडीएलाही रामराम ठोकला. शिवसेनेच्या जाण्याने एनडीएची मोट सैल झाल्याचे स्पष्टच असताना भाजपला दुसरा धक्का बसला आहे. भाजपचा दुसरा जुना मित्रपक्ष अकाली दलानेही एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. हरसीमरत कौर बादल यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर पाठोपाठ पक्षाने एनडीएतून बाहेर पडण्याचा टोकाचा निर्णय घेतला. अकाली दलाने कृषी विधेयकांचा निषेध करत हा निर्णय घेतला असून हा निर्णय अनेक कारणांमुळे महत्त्वाचा आणि तितकाच भाजपची डोकेदुखी वाढवणारा ठरला आहे.
वाचा:
अकाली दल कृषी विधेयकांच्या निषेधार्थ एनडीएतून बाहेर पडल्यानंतर विविध राजकीय पक्षांकडून या निर्णयाचे स्वागत केले जात आहे. आज शिवसेना नेते व मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांनी ट्वीटरच्या माध्यमातून अकाली दलाचे कौतुक केले. शेतकऱ्यांच्या हितासाठी अकाली दलाने एनडीएतून बाहेर पडण्याचा जो निर्णय घेतला आहे त्याचे शिवसेना स्वागत करत असल्याचे संजय राऊत यांनी नमूद केले. राऊत यांच्या या ट्वीटनंतर तीनच तासांच्या अंतराने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही भाजपकडून दुखावलेल्या व धाडसी निर्णय घेणाऱ्या अकाली दलाचं जाहीर अभिनंदन केलं. ‘कृषी विधेयकांचा विरोध करण्यासाठी एनडीएतून बाहेर पडण्याचा जो निर्णय आपण घेतला आहे त्यासाठी तुमचे अभिनंदन’, अशा शब्दांत पवार यांनी अकाली दलाची स्तुती केली आहे. शेतकऱ्यांच्या पाठिशी ठामपणे उभे राहिल्याबद्दल आभार, असेही पवार यांनी पुढे नमूद केले आहे. अकाली दलाचे सर्वेसर्वा प्रकाशसिंग बादल, पक्षाचे अध्यक्ष सुखबीरसिंग बादल, खासदार हरसीमरत कौर बादल यांचा नामोल्लेख करत पवार यांनी हे ट्वीट केलं आहे. देशातील एक प्रमुख नेते या नात्याने पवार यांचे हे ट्वीट राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचं मानलं जात आहे.
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times