नवी दिल्ली: संपूर्ण जग करोना व्हायरसविरोधात लढा देत आहे. यामुळे अनेक देश करोनातून मुक्त होण्यासाठी लस तयार करण्यात गुंतले आहेत. या शर्यतीत रशियाची लस आघाडीवर असल्याचं म्हटलं जातंय. त्याच वेळी भारतात करोनातून बरे होण्याचे प्रमाण ८० टक्क्यांवर पोहोचले आहे. पण करोनामुक्त झालेल्या अनेक नागरिकांना पुन्हा संसर्ग झाल्याचं वृत्त आहे. भारतातील नागरिक कळप रोग प्रतिकारशक्तीपासून बरेच दूर आहेत, असं केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन म्हणाले.

सेरो सर्वेक्षणचा दुसरा अहवाल

‘भारतीय नागरिक कळप रोग प्रतिकारशक्तीपासून खूप दूर आहे. आपण करोनाबाबत कुठली ढिलाई बाळगायला नकोय आणि नियमांचं गांभीर्याने पालन केलं पाहिजे. करोनामुक्त झालेल्या नागरिकांना पुन्हा संसर्ग का होत आहे हे पाहण्यासाठी आयसीएमआर () तपास करत आहे. पण सध्या अशा रुग्णांची संख्या कमी आहे, असं हर्षवर्धन यांनी सिरो सर्वेक्षणातील दुसर्‍या अहवालावर स्पष्ट केलं.

रेमेडिसवीर आणि प्लाझ्मा थेरपी’साठी मार्गदर्शक सूचना जारी

रेमेडीसवीर आणि प्लाझ्मा थेरपीला प्रोत्साहन देण्यात येणार नाही. सरकारने याबाबत मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. याव्यतिरिक्त, खासगी रुग्णालयांनाही अशा उपचारांचा नियमित वापर करू नये असा सल्ला देण्यात आला आहे, असं हर्षवर्धन म्हणाले.

दुबई आणि ब्रिटनच्या प्रवाशांमुळे भारतात करोनाचा प्रादुर्भाव

करोना व्हायरसचा प्रादुर्भाव देशात वाढतच आहे. दररोज हजारो जण करोना पॉझिटिव्ह आढळून येत असल्याने हे एक चिंतेचं कारण आहे. दरम्यान, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या (IIT Mandi) अभ्यासात दुबई आणि ब्रिटनमधील प्रवासी भारतात करोना आणणारे प्राथमिक स्त्रोत असल्याचं समोर आलं आहे. हे संशोधन जर्नल ऑफ ट्रॅव्हल मेडिसिनमध्ये प्रकाशित झालं आहे. भारतातील करोनाचा प्रादुर्भाव प्रामुख्याने आंतरराष्ट्रीय प्रवासामुळे भारताच्या विविध राज्यांमध्ये पसरला आहे, असा दावा अभ्यासात केला गेला आहे.

करोना संसर्गाचा जागतिक ते राष्ट्रीय स्तरापर्यंत तपास केला गेला आहे. यात भारतात प्रादुर्भाव करण्यास महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या काही सुपर स्प्रेडरचा तपास केला गेला आहे. रुग्णांच्या भेटीचा इतिहास पाहता बहुतेक नागरिक हे स्थानिक होते.

तामिळनाडू, दिल्ली आणि आंध्र प्रदेशात संसर्ग झालेल्या रुग्णांमुळे आपल्या समाजाबाहेरही करोनाचा संसर्ग पसरवला. तर गुजरात, राजस्थान, महाराष्ट्र, केरळ, जम्मू-काश्मीर आणि कर्नाटकमधील संसर्ग झालेल्या नागरिकांचा स्थानिक ठिकाणी प्रादुर्भाव करण्यास महत्त्वपूर्ण भूमिका होती. यातील काहीजणांनी तर इतर राज्यातही करोनाचा संसर्ग पसरवला, असं अभ्यासातून समोर आलं.

दुबई आणि ब्रिटनवरून आलेल्या प्रवाशांमुळे भारतातील राज्यांमध्ये करोनाचा संसर्ग पसरला. या अभ्यासात संशोधन करणाऱ्या टीमने जानेवारी ते एप्रिलपर्यंत संसर्ग झालेल्या रुग्णांच्या प्रवासाच्या तपशिलाचा उपयोग केला.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here