जळगाव: शहरापासून थोड्याच अंतरावर असलेल्या नशिराबाद गावातील तीन बालके गावालगत पाटचारीत पोहण्यासाठी गेले असता त्यांचा पाण्यात बूडून मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना आज दुपारी २.३० वाजता घडली. पट्टीच्या पोहणाऱ्यांनी सायंकाळी सहा वाजता तिघांचे मृतदेह बाहेर काढले. (वय ११), (वय १३) व (वय ११) अशी मृत मुलांची नावे आहेत.

वाचा:

मोहीत, आकाश व ओम हे तिघे सोमवारी दुपारी ११.३० वाजता नशिराबाद पेठ भागात असलेल्या पाटचारीत पोहण्यासाठी गेले होते. दुपारी २.३० वाजता ते पाण्यात बुडाल्याचे गुरे चारणारे तसेच शेतकरी सोपान वाणी यांच्या लक्षात आले. यानंतर वाणी यांनी नशिराबाद पोलीस ठाण्यात संपर्क करून माहिती दिली. यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कापडणीस, पंकज महाजन, विनोद रंधे, प्रदीप साळी, अनिल पाटील, मोहन कोलते, भूषण कोल्हे हे घटनास्थळी गेले. यातील दोन मुलं आतेभाऊ-मामेभाऊ आहेत.

वाचा:

एका मुलाचा मृतदेह काही वेळातच हाती लागला. यानंतर त्याच्या सोबत असलेल्या दोघांचा शोध सुरू झाला. पट्टीच्या पोहणाऱ्यानी सायंकाळी सहा वाजता आणखी दोघांचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढले. दरम्यानच्या वेळात मुलांचे कुटुंबीय देखील घटनास्थळी दाखल झाले होते. तिन्ही मृतदेह पाण्यातून बाहेर काढल्यानंतर कुटुंबियांनी एकच आक्रोश केला. मृतदेह बाहेर काढल्यानंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणले होते. या प्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here