मुंबई: उत्तर प्रदेशातील येथील तरुणीवरील सामूहिक अत्याचाराचे प्रकरण आणि पीडित तरुणीचा आज मृत्यू झाल्याची घटना अत्यंत क्लेशदायक, संतापजनक आणि लाजिरवाणी आहे. असं कृत्य करणारे नराधम समाजात आहेत हे सहन होण्यापलीकडे आहे. असं अमानुष कृत्य करणाऱ्यांना त्यांच्या कृत्यापेक्षाही जबर शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री यांनी केली आहे. ( Reacts On )

वाचा:

उत्तर प्रदेश सरकारने न्यायालयीन प्रक्रिया तातडीने पूर्ण करून या घटनेतील आरोपींना त्यांच्या पापाचं फळ लवकरात लवकर द्यावं. न्यायालयाच्या माध्यमातून आरोपींना कठोर शिक्षा देत असतानाच स्त्रीशक्तीचा आदर करणाऱ्या सभ्य समाजनिर्मितीची जबाबदारीही आपल्या सर्वांची आहे. महिलांकडे बघण्याचा समाजाचा दृष्टीकोन सकारात्मक होईल, यासाठी प्रयत्न होण्याची गरज आहे, असेही अजित पवार यांनी नमूद केले आहे. हाथरसची घटना ही या देशातील शेवटची घटना ठरावी यासाठी शासन, न्यायालय आणि समाज सर्वजण मिळून प्रयत्न करतील, आपापली जबाबदारी पार पाडतील असा विश्वास व्यक्त करीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हाथरस येथील पीडीत तरुणीला श्रद्धांजली वाहिली आहे.

वाचा:

आरोपींना कडक शिक्षा द्या: पाटील

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष यांनीही या घटनेवर तीव्र भावना व्यक्त केल्या. हाथसरमधील सामूहिक बलात्काराची घटना अत्यंत गंभीरतेने घेवून आरोपींना कडक शिक्षा द्या, अशी मागणी जयंत पाटील यांनी ट्वीटद्वारे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री यांच्याकडे केली जिथे गंगा, यमुना यांची संस्कृती वास करते. ज्या भूमीचं प्रतिनिधीत्व स्वर्गीय इंदिरा गांधी, राजीव गांधी, कांशीराम आणि अशा अनेक महान व्यक्तींनी केले त्या भूमीतून अशा प्रकारची बातमी येते त्यावेळी मनाला फार दु:ख होते. या घटनेकडे गांभीर्याने पाहून आरोपींवर कारवाई करा, असे जयंत पाटील यांनी पुढे नमूद केले.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here