ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतल्या पहिल्याच सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा १० विकेट्सने दारुण पराभव केला. भारताने ऑस्ट्रेलियापुढे अवघे २५६ धावांचे आव्हान ठेवले, ते ऑस्ट्रेलियाने ३७.४ षटकांतच पूर्ण केले. गेल्या १५ वर्षांतला हा भारताचा सर्वात लाजिरवाणा पराभव आहे. या मालिकेत ऑस्ट्रेलियाने १-० अशी आघाडी घेतली आहे.
सलामीवीर डेव्हिड वॉर्नर आणि अॅरॉन फिंच यांच्या शतकी खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने भारताचा १० विकेट्सने अक्षरश: धुव्वा उडवला. वॉर्नर याने १२८ धावा तर फिंचने ११० धावा कुटल्या. दोघांनीच हे लक्ष्य पूर्ण करत टीम इंडियाची दाणादाण उडवली. या दोन्ही सलामीवीरांनी ३० चौकार आणि ५ षटकारांच्या जोरावर ३७.४ षटकांत विजयाचे लक्ष्य पूर्ण केले. ल्या १५ वर्षांत पहिल्यांदाच टीम इंडिया १० विकेट्सने हरली आहे. यापूर्वी कोलकाता येथे इडन गार्डनमध्ये २००५ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळताना भारताला १० विकेट्सने पराभवाचा सामना करावा लागला होता. त्या सामन्यात द. आफ्रिकेला भारताने १८९ धावांचं लक्ष्य दिलं होतं.
तत्पूर्वी ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकली आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय करण्याचा निर्णय घेतला. भारताकडून शिखर धवनने सर्वाधिक ७४ धावा केल्या. या सामन्यात कर्णधार विराट कोहलीने रोहित शर्मा, शिखर धवन आणि के.एल. राहुल या तिघांनाही संधी दिली होती. वानखेडेवर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात १३ वर्षानंतर हा सामना होत झाला. २०१२पासून वानखेडेवर झालेल्या दोन सामन्यात भारताचा पराभव झाला होता. ही परंपरा भारताने मंगळवारीही कायम ठेवली.
‘विराट सेना’ ५० षटकंही पूर्ण करू शकली नाही
कर्णधार विराट कोहली अवघ्या १६ धावा करून बाद झाला. रवींद्र जडेजाने २५ तर ऋषभ पंतने २८ धावा काढल्या. केवळ के. एल. राहुलने ४७ तर शिखर धवनने ७४ धावांची खेळी केली. ४९.१ षटकांत टीम इंडियाने गाशा गुंडाळला.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times