मुंबईः हाथरसमध्ये तरुणीसोबत झालेल्या दुर्दैवी घटनेनंतर देशात सर्वसामान्यांपासून राजकीय नेत्यांनीही संताप व्यक्त केला आहे. या घटनेवरून काँग्रेसने उत्तर प्रदेश सरकारवर निशाणा साधला आहे.

उत्तर प्रदेशमधील हाथसरयेथे १९ वर्षीय तरुणीवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. काल, या तरुणीचा दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. पीडितेला न्याय मिळावा यासाठी आक्रमक झाली आहे. महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी करणाऱ्या विरोधकांना काँग्रेस नेते यांनी सणसणीत टोला हाणला आहे.

‘भारतमातेच्या एका मुलीवर बलात्कारकरून तिची हत्या करण्यात आली. त्यानंतर १० दिवसांनंतरही तक्रार दाखल करून घेतली नाही. तिला दिल्लीतील रुग्णालयात पोहोचवण्यास उशीर केला आणि तिच्यावर पोलिसांनी जबरदस्ती अंत्यसंस्कार केले. याला जंगलराज म्हणतात. उत्तर प्रदेशमध्ये राष्ट्रपती शासन लागू करा,’ अशी मागणी काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी केली आहे.

जीभ कापली, पाठीचा कणा मोडला

१९ वर्षांच्या पीडित दलित मुलीवर १४ सप्टेंबर रोजी उत्तर प्रदेशच्या हाथरसमध्ये चार हैवानांनी क्रूरपणे अत्याचार केले होते. आपलं कृत्य लपवण्यासाठी आणि मुलीनं काही बोलू नये यासाठी त्यांनी सामूहिक बलात्कारानंतर जीभ कापली होती, तसंच पाठीचा कणाही मोडला होता. रुग्णालयात दाखल केल्यानंतर ही मुलगी तब्बल नऊ दिवस बेशुद्धावस्थेतच होती. शुद्धीवर आल्यानंतर तिनं न बोलताच आपल्यावर झालेले सगळे अत्याचार इशाऱ्यांतूनच व्यक्त केले. तिच्या अंगावरच्या जखमाच सगळं काही सांगत होत्या. गेले १५ दिवस ती मृत्यूशी झुंजच देत होती आणि आज तिची ही लढाई अर्धवट राहिली.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here