मुंबईः राज्याचे माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्ष नेते यांच्यावर भाजपकडून मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. फडणवीस यांची प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आलं आहे. आज भाजपकडून त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.

बिहार विधानसभेच्या निवडणूका तीन टप्प्यात होणार आहेत. पहिल्या टप्प्याचे मतदान २८ ऑक्टोबर, दुसऱ्या टप्प्याचे मतदान ३ नोव्हेंबर आणि तिसऱ्या टप्प्याचे मतदान ७ नोव्हेंबरला होणार असून १० नोव्हेंबरला बिहारचा निकाल स्पष्ट होणार आहेत. देवेंद्र फडणवीस यांची प्रभारी म्हणून नियुक्ती झाल्यानंतर बिहार निवडणुका महाराष्ट्रासाठी महत्त्वाच्या ठरणार आहेत.

फडणवीस यांच्यावर पक्षाकडून अन्य राज्याच्या निवडणूक प्रभारीपदाची जबाबदारी प्रथमचं सोपवली आहे. फडणवीस यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणूकी दरम्यान आपल्या संघटन कौशल्याचा वापर करत सर्वाधिक उमेदवार निवडून आणले होते. त्यामुळं पक्षानं त्यांच्या याच कामगिरीवर खुश होऊन त्यांना हे प्रमोशन दिलं असल्याची चर्चा आहे. फडणवीस बिहारमध्येही आपलं नेतृत्वाच्या जोरावर चांगली कामगिरी करतील अशी, भाजप नेतृत्वाला आशा आहे.

बिहारमध्ये सध्या नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली संयुक्त जनता दल व भाजपच्या आघाडीचं सरकार आहे. बिहारमध्ये नितीश कुमार यांचं पारड जड असलं तरी आपलं स्थान मजबूज करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. त्यामुळं फडणवीस ते काम करु शकतात, असा विश्वास हायकमांडला आहे. काही दिवसांपूर्वी फडणवीस भाजपच्या प्रदेश सुकाणू समितीची निवडणूक तयारीची बैठकीत सहभागी झाले होते. या बैठकीत बिहारचे उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदींसह ज्येष्ठ भाजप नेते, भूपेंद्र यादवहे देखील उपस्थित होते. तर, गेल्या काही दिवसांपासून देवेंद्र फडणवीस बिहार दौऱ्यावर आहेत.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. बिहार निवडणूकीसाठी मुंबई व महाराष्ट्राची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न असल्याचे आरोप भाजपवर होत होते.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here